Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर वडपाले ते लोणेरे रस्त्याची दूरवस्था

पेव्हर ब्लॉक उखडले; दुचाकीस्वारांना करावी लागते कसरत


माणगाव : ऐन गणेशोत्सवात कोकणात जाणार्‍या (Mumbai Goa Highway) गणेशभक्तांसाठी वडपाले ते लोणेरे या पर्यायी मार्गावर पेव्हर ब्लॉक टाकून घाईघाईने रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले होते. या रस्त्याची तीन ते चार महिन्यातच पूर्णपणे दूरवस्था झाली असून वाहन चालकांना खास करून दुचाकीस्वारांना या रस्त्यावरून ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरुन प्रवास करताना नाहक त्रास तर होतच आहे, पण त्यात वाहतूक कोंडीचाही मनस्ताप वाहन चालकांना व प्रवाशांना सहन करावा लागत आहे.


गेल्या पंधरा वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. लोणेरे ते वडपाले या रस्त्याचे काम आजही रखडले आहे. चौपदरीकरणाचे काम सुरु असल्यामुळे लोणेरे ते वडपाले येथे पर्यायी मार्ग काढण्यात आला आहे. गणेशोत्सवापूर्वी या पट्टयाचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी अनेक आश्वासने दिली गेली. मात्र, ती फोल ठरली. अनेक आंदोलने, उपोषणे झाली, पण महामार्ग काही झाला नाही.



गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांसाठी गणपती सणापूर्वी या महामार्गाची पाहणी करण्यात येते. मात्र, तरीही याची अवस्था 'जैसे थे'च आहे. यावर्षी गणेशोत्सवापूर्वी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामार्गाची पाहणी केली. त्यावेळी गणेशभक्तांना वाहतूक कोंडी आणि रस्त्याचा त्रास होऊ नये म्हणून पर्यायी मार्गावर पेव्हर ब्लॉक टाकण्यात आले. आणि महामार्ग डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही दिली. त्याचवेळी कामचुकार करणार्‍या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही दिले होते.


खराब झालेल्या या पर्यायी मार्गावर एखादे वाहन बंद पडले, तर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. त्यातच शनिवार आणि रविवारी या सुट्टीच्या दिवशी तर वडपाले ते लोणेर हे तीन ते चार किलोमीटरचे अंतर कापताना तास दोन तास प्रवाशांना ताटकळत राहावे लागत आहे.

Comments
Add Comment

फक्त ९५ चेंडूत १७१ धावा करणारा वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही

मुंबई : भारताच्या वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत यूएई विरुद्ध ९५ चेंडूत १७१ धावा केल्या. ही

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसंग्राम लढणार

मुंबई : मुंबई, ठाणे, भिवंडी आणि नवी मुंबई येथील शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत

पुण्यात राजगुरूनगरमध्ये कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्याचा मित्रावर चाकूने हल्ला; मित्राचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे : शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळख मिरवणाऱ्या पुण्याची प्रतिमा वाढत्या गुन्हेगारीमुळे मलिन होऊ लागली आहे. ताजी

अखेर प्रतीक्षा संपली! मुंबई, पुणे, नागपूरसह २९ शहरांत 'इलेक्शन'चा धुराळा; निकाल कधी ? वाचा सविस्तर

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या राज्यातील २९

खलनायक अक्षय खन्नाच्या भूमिकेचा जलवा, ‘धुरंधर’ने मोडले ‘छावा’-‘पुष्पा २’चे रेकॉर्ड

मुंबई : ‘छावा’ आणि ‘पुष्पा २’नंतर बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा मोठा भूकंप घडवणारा सिनेमा म्हणजे ‘धुरंधर’. आदित्य धर

धक्कादायक! गुंडांनी केला थेट पोलिसांवर हल्ला, मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कांदिवली: मुंबईच्या कांदिवलीमधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस