माणगाव : ऐन गणेशोत्सवात कोकणात जाणार्या (Mumbai Goa Highway) गणेशभक्तांसाठी वडपाले ते लोणेरे या पर्यायी मार्गावर पेव्हर ब्लॉक टाकून घाईघाईने रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले होते. या रस्त्याची तीन ते चार महिन्यातच पूर्णपणे दूरवस्था झाली असून वाहन चालकांना खास करून दुचाकीस्वारांना या रस्त्यावरून ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरुन प्रवास करताना नाहक त्रास तर होतच आहे, पण त्यात वाहतूक कोंडीचाही मनस्ताप वाहन चालकांना व प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
गेल्या पंधरा वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. लोणेरे ते वडपाले या रस्त्याचे काम आजही रखडले आहे. चौपदरीकरणाचे काम सुरु असल्यामुळे लोणेरे ते वडपाले येथे पर्यायी मार्ग काढण्यात आला आहे. गणेशोत्सवापूर्वी या पट्टयाचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी अनेक आश्वासने दिली गेली. मात्र, ती फोल ठरली. अनेक आंदोलने, उपोषणे झाली, पण महामार्ग काही झाला नाही.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणार्या गणेशभक्तांसाठी गणपती सणापूर्वी या महामार्गाची पाहणी करण्यात येते. मात्र, तरीही याची अवस्था ‘जैसे थे’च आहे. यावर्षी गणेशोत्सवापूर्वी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामार्गाची पाहणी केली. त्यावेळी गणेशभक्तांना वाहतूक कोंडी आणि रस्त्याचा त्रास होऊ नये म्हणून पर्यायी मार्गावर पेव्हर ब्लॉक टाकण्यात आले. आणि महामार्ग डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही दिली. त्याचवेळी कामचुकार करणार्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही दिले होते.
खराब झालेल्या या पर्यायी मार्गावर एखादे वाहन बंद पडले, तर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. त्यातच शनिवार आणि रविवारी या सुट्टीच्या दिवशी तर वडपाले ते लोणेर हे तीन ते चार किलोमीटरचे अंतर कापताना तास दोन तास प्रवाशांना ताटकळत राहावे लागत आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…