Mumbai Rani Baug : राणीबागेच्या पार्किंग शुल्कात चारपट वाढ!

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील (Veermata Jijabai Bhosale Botanical Udyan and Zoo) पार्किंग शुल्कात थेट चारपट वाढ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. चारचाकी वाहनांना २० रुपयांऐवजी ८० रुपये, तर दुचाकीस्वारांना १० रुपयांऐवजी ३० रुपये मोजावे लागणार असल्याने राणी बाग महागली आहे.



देशविदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय म्हणजेच राणीबागेत दररोज ८ ते १० हजार पर्यटक येतात. पालिकेच्या उद्यान व प्राणिसंग्रहालयात प्रवेशद्वारातून परिसरातील दुकानदारही आपली वाहने आणून लावतात. संपूर्ण दिवसभर वाहने पार्क करून फक्त दहा ते वीस रुपये मोजतात. हे निदर्शनास आल्यामुळेच ही दरवाढ करण्यात आल्याचे प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले. मात्र परिसरातील दुकानदारांच्या घुसखोरीचा फटका आता पर्यटकांना बसणार आहे.


राणी बागेत चौकोनी कुटुंबाला १०० रुपये तिकीट असून लहान मुलास २५ रुपये, तर प्रौढ व्यक्तीस ५० रुपये तिकीट आहे. त्यात आता पार्किंगच्या ८० रुपयांची भर पडली. उद्यान व प्राणिसंग्रहालयाला लागून असलेल्या हेरिटेज भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या तिकीट दरातही आता वाढ करण्यात आली आहे. यामध्ये लहान मुलांसाठी असणारे ५ रुपयांचे तिकीट दहा रुपये तर प्रौढांसाठी असणारे दहा रुपयांचे तिकीट २० रुपये करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत