Mumbai Metro : एमएमआरडीएची मेट्रो मार्ग ९, ७ अ यास नवीन मुदतवाढ!

दहिसर पूर्व ते मीरा-भाईंदर मेट्रो प्रवासासाठी जून २०२५ उजाडणार


अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनल प्रवासही लांबणीवर


मुंबई : एमएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्पांमध्ये विलंब होत असल्याचे दिसून आले असून, मेट्रो मार्ग ९ (दहिसर पूर्व ते मिरा भाईंदर) आणि मेट्रो मार्ग ७ अ (अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनल) यांसाठी नव्या मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही मेट्रो मार्गांचे कार्यादेश ९ सप्टेंबर २०१९ रोजी जारी करण्यात आले होते. मात्र, विविध अडचणींमुळे प्रकल्प पूर्ण होण्यात विलंब होत आहे. त्यामुळे या मार्गांवरील नागरिकांना मेट्रो सुविधेसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.



आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेकडे या प्रकल्पांबाबत माहिती विचारली होती. त्यास उत्तर देताना कार्यकारी अभियंता सचिन कोठावळे यांनी ही माहिती प्रदान केली. एमएमआरडीएची मेट्रो मार्ग ९ आणि ७ अ यास नवीन मुदतवाढ दिली गेली असून मेट्रो मार्ग ९ साठी जून २०२५ तर मेट्रो मार्ग ७ अ साठी जुलै २०२६ अशी नवीन डेडलाईन दिली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेने दिली आहे. मेट्रो मार्ग ९ जो दहिसर पूर्व ते मिरा भाईदर पर्यंत आहे आणि मेट्रो मार्ग ७ अ जो अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनल पर्यंत आहे. या दोन्ही मार्गाचे कार्यादेश ९ सप्टेंबर २०१९ असे आहे.


मेट्रो मार्ग ९ ची काम पूर्ण करण्याची तारीख ही ८ सप्टेंबर २०२२ अशी होती ज्यास मुदतवाढ देत ही नवीन तारीख आता जून २०२५5 अशी करण्यात आली आहे. तर मेट्रो मार्ग ७ अ ची काम पूर्ण करण्याची तारीख ही ८ मार्च २०२३ अशी होती ज्यास मुदतवाढ देत ही नवीन तारीख आता जुलै २०२६ अशी करण्यात आली आहे. अनिल गलगली यांच्या मते अश्या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या विलंबाने नागरिकांना वेळेत सुविधा उपलब्ध होत नाही आणि खर्चात वाढ होत असल्याने जनतेच्या करांचा पैसा वाया जातो. अश्यावेळी दंडात्मक कारवाई आणि कंत्राटदाराला काळया यादीत टाकणे योग्य होईल, असे मत गलगली यांनी व्यक्त केले आहे.

Comments
Add Comment

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'शिवशाही पुनर्वसन' प्रकल्पाला बळकटी: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या उद्देशाने शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची स्थापना केली होती, तोच वारसा

'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

मुंबई :  महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा

Maharashtra Weather Alert : भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाचा कहर; शेतकऱ्यांसाठी पुढील ४८ तास धोक्याचे

मुंबई : राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दुपारच्या वेळेतच

उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांची अण्णा बनसोडे यांच्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट..

उपराष्ट्रपती यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी चैत्यभूमी येथे येण्याचे शिष्ट मंडळाचे निमंत्रण.. मुंबई  :

येत्या तीन महिन्यांत 'पीएनजी' साठी अर्ज न केल्यास 'एलपीजी' सिलिंडर बंद

मंत्री छगन भुजबळ यांचा इशारा; व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस पुरवठ्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ मुंबई : राज्यातील

मुंबईच्या डब्बेवाल्यांची पाच दिवसांची सुट्टी, मुंबईकरांना करावी लागणार डब्याची सोय

मुंबई : मुंबई लाईफलाईन म्हटली की दोन गोष्टी नजरेसमोर येतात एक म्हणजे मुंबईची लोकल ट्रेन आणि दुसरी म्हणजे मुंबईचे