Mumbai Metro : एमएमआरडीएची मेट्रो मार्ग ९, ७ अ यास नवीन मुदतवाढ!

  123

दहिसर पूर्व ते मीरा-भाईंदर मेट्रो प्रवासासाठी जून २०२५ उजाडणार


अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनल प्रवासही लांबणीवर


मुंबई : एमएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्पांमध्ये विलंब होत असल्याचे दिसून आले असून, मेट्रो मार्ग ९ (दहिसर पूर्व ते मिरा भाईंदर) आणि मेट्रो मार्ग ७ अ (अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनल) यांसाठी नव्या मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही मेट्रो मार्गांचे कार्यादेश ९ सप्टेंबर २०१९ रोजी जारी करण्यात आले होते. मात्र, विविध अडचणींमुळे प्रकल्प पूर्ण होण्यात विलंब होत आहे. त्यामुळे या मार्गांवरील नागरिकांना मेट्रो सुविधेसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.



आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेकडे या प्रकल्पांबाबत माहिती विचारली होती. त्यास उत्तर देताना कार्यकारी अभियंता सचिन कोठावळे यांनी ही माहिती प्रदान केली. एमएमआरडीएची मेट्रो मार्ग ९ आणि ७ अ यास नवीन मुदतवाढ दिली गेली असून मेट्रो मार्ग ९ साठी जून २०२५ तर मेट्रो मार्ग ७ अ साठी जुलै २०२६ अशी नवीन डेडलाईन दिली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेने दिली आहे. मेट्रो मार्ग ९ जो दहिसर पूर्व ते मिरा भाईदर पर्यंत आहे आणि मेट्रो मार्ग ७ अ जो अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनल पर्यंत आहे. या दोन्ही मार्गाचे कार्यादेश ९ सप्टेंबर २०१९ असे आहे.


मेट्रो मार्ग ९ ची काम पूर्ण करण्याची तारीख ही ८ सप्टेंबर २०२२ अशी होती ज्यास मुदतवाढ देत ही नवीन तारीख आता जून २०२५5 अशी करण्यात आली आहे. तर मेट्रो मार्ग ७ अ ची काम पूर्ण करण्याची तारीख ही ८ मार्च २०२३ अशी होती ज्यास मुदतवाढ देत ही नवीन तारीख आता जुलै २०२६ अशी करण्यात आली आहे. अनिल गलगली यांच्या मते अश्या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या विलंबाने नागरिकांना वेळेत सुविधा उपलब्ध होत नाही आणि खर्चात वाढ होत असल्याने जनतेच्या करांचा पैसा वाया जातो. अश्यावेळी दंडात्मक कारवाई आणि कंत्राटदाराला काळया यादीत टाकणे योग्य होईल, असे मत गलगली यांनी व्यक्त केले आहे.

Comments
Add Comment

'टॅरिफ 'मुळे कोकणचा आमरस संकटात

मुंबई (प्रतिनिधी) :अमेरिकेने भारतावर २५ टक्के टैरिफ लादल्यामुळे त्याचा फटका कोकणातील हापूस आमरस (मैंगो पल्प)

उद्धव ठाकरे आणि आव्हाडांच्या भूमिकेवर भाजपचा सवाल

हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात