Manu Bhaker : मनू भाकर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकलेली पदके परत करणार; नेमकं कारण काय?

मुंबई : मनू भाकरने (Manu Bhaker) गेल्या वर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic 2024) अचूक लक्ष्यभेद करून इतिहास रचला आणि ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकली. मात्र आता या दिग्गज नेमबाजाची दोन्ही पदके परत घेतली जाणार आहे. ही पदके अवघ्या ५ महिन्यांत खराब झाली. यामुळे आता ही पदके बनवणारी फ्रेंच कंपनी मोनाई डी पॅरिस मनूला नवीन ब्रँड पदके देणार आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर काही दिवसांतच मनू भाकरच्या पदकांचा रंग उडाला होता आणि या पदकांची अवस्था वाईट झाली होती. त्यामुळे पॅरिसमध्ये जिंकलेल्या दोन कांस्यपदकांच्या जागी मनूला नवीन पदके मिळणार आहे. केवळ मनू भाकरच नाही तर जगभरातील अनेक खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या पदकांबाबत तक्रारी केल्या होत्या. पॅरिस ऑलिम्पिक पदकांचे खराब दर्जाचे फोटो खेळाडूंनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या तक्रारींनंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने म्हटले आहे की, खराब झालेले ऑलिम्पिक पदक पुन्हा एकदा मोनेई डी पॅरिसकडून दुरुस्त केले जातील आणि ते नवीन बनवून खेळाडूंना परत केले जातील.


पॅरिस ऑलिम्पिक आयोजन समितीने हे पदक बनवण्याचा ठेका मोनाई डी पॅरिसला दिला होता. ही एक सरकारी मालकीची कंपनी आहे जी फ्रान्ससाठी नाणी आणि इतर चलन देखील तयार करते. अहवालानुसार, कंपनी येत्या आठवड्यात खेळाडूंची खराब झालेली सर्व पदके बदलून देईल. फ्रेंच कंपनी मोनाई डी पॅरिसने प्रत्येक पदकात आयफेल टॉवरमधील लोखंडाचे तुकडे वापरले. या कंपनीने ऑलिम्पिक खेळांसाठी ५,०८४ सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली होती.


मनू भाकर स्वातंत्र्यानंतर एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिलीच महिला आहे. वैयक्तिक १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकून तिने ऑलिम्पिक पदक जिंकणारी देशाची पहिली नेमबाज बनून खेळांमध्ये भारताचे पदक खाते उघडले. २२ वर्षीय मनू भाकरने त्यानंतर सरबज्योत सिंगसोबत १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक कांस्यपदक जिंकले.

Comments
Add Comment

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताची घट्ट पकड, राहुल, जुरेल आणि जडेजाने ठोकले शतक

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वेस्ट