Kinkrant 2025 : किंक्रात म्हणजे काय? का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या सविस्तर

मुंबई : भोगी आणि मकर संक्रांतीनंतर साजरा केला जाणारा सण म्हणजे किंक्रात (Kinkrant 2025). या दिवसाला करिदिन म्हणून देखील ओळखले जाते. दरवर्षी हा सण १५ जानेवारीला साजरा करण्यात येतो. शास्त्रानुसार या दिवसाला अशुभ मानले जाते. मात्र यामागचं नेमकं कारण आणि पौराणिक कथा काय आहे जाणून घ्या.



काय आहे कथा?


संकारसुर नावाचा राक्षस होता. तो गरिबांना प्रचंड प्रमाणाता त्रास देत असे. त्याचा वध करण्यासाठी देवीने संक्रांतीचे रुप घेतले. त्यानंतर संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुरा नावाच्या राक्षसाला ठार मारले होते आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो.



किक्रांत कशी साजरी केली जाते?


किंक्रांतच्या दिवशी देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. या दिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी किंक्रांतच्या दिवशी स्त्रिया हळदीकुंकू समारंभ साजरा करतात.



किंक्रात दिवशी हे करु नये


या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असे सांगितले जाते. तसेच किंक्रांतीला मोकळे केस सोडून काम करणे वर्ज्य मानले जाते. घरात सतत भांडण होत असतील तर या दिवशी शांत राहायला हवे. लांबचा प्रवास टाळायला हवा.



किंक्रात कशी साजरी करावी?


किंक्रांतला भोगीच्या दिवशी केलेली भाकरी राखून ठेवली जाते आणि ती शिळी भाकरी खाल्ली जाते, केरकचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असे सांगितले जाते, तसेच, यादिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याचीही प्रथा आहे. या दिवशी संक्राती देवीची पूजा करून तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. त्याचप्रमाणे कुलदैवताचे नामस्मरण केले जाते.

Comments
Add Comment

दीपिका करणार कमबॅक! २०२६ मध्ये बिग बजेट चित्रपटांमधून झळण्याची शक्यता

मुंबई: बॉलीवूडची ग्लॅम अभिनेत्री दीपिका पादुकोण २०२५ मध्ये अनेक वादांमध्ये अडकली. तिच्या आठ तास काम करण्याच्या

नववर्षाच्या सुरुवातीला भारतीय महिला संघाने घेतले बाबा महाकाल दर्शन

२०२५ च्या अखेरीस धमाका करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या स्टार खेळाडूंनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला बाबा

'इक्किस' चित्रपटात दिसलेला अगस्त्य नंदा आणि बच्चन कुटुंबियांचे नाते काय?

मुंबई: भारतीय सिनेसृष्टीत हि-मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांचा देशभक्तीपर इक्कीस हा शेवटचा चित्रपट

आणखी एका न्यायालयीन लढ्यात धनंजय मुंडेंचा विजय!

शपथपत्राविरोधात दाखल केलेली फिर्याद परळी न्यायालयाने फेटाळली परळी : माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा आणखी एका

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी इक्बाल सिंग चहल मुख्य निरीक्षक

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ जानेवारीला

नव्या विमानतळाच्या धावपटटीच्या कार्यक्ष्मतेसाठी ‘टॅक्सीवे एम’ कार्यान्वित

गर्दीच्या वेळी आगमन आणि प्रस्थानाचा गोंधळ टळणार मुंबई : जगातील सर्वात जास्त व्यस्त सिंगल-रनवे विमानतळांपैकी एक