Samruddhi Highway Decorated : समृद्धी महामार्गावरील बोगद्यांवर लोकसंस्कृतीचे दर्शन!

  106

मुंबई : एमएसआरडीसी नागपूर – मुंबई दरम्यान ७०१ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग (Samruddhi Highway) बांधत आहे. यापैकी ६२५ किमी लांबीचा महामार्ग पूर्ण झाला असून हा महामार्ग सध्या वाहतूक सेवेत दाखल आहे. आता या महामार्गावरील इगतपुरी – आमणे दरम्यानच्या ७६ किमी लांबीच्या शेवटच्या टप्प्याचे काम अतिशय वेगात सुरू आहे. उर्वरित कामे फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करून हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अतिजलद प्रवास करताना आता चालकांसह प्रवासी यांना वारली लोकसंस्कृतीचे दर्शन घडणार आहे.



लोकसंस्कृतीचे संवर्धन करण्याचा प्रयत्न


शेवटच्या टप्प्यातील ठाणे – नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यांवर वारली चित्रकला, विपश्यना ध्यान साधना, शेती व्यवसायाची माहिती देणारी चित्रे रेखाटण्यात आली आहेत. स्थानिक लोकसंस्कृतीची अनुभूती प्रवासादरम्यान प्रवासी – वाहनचालकांना घेता यावी आणि या लोकसंस्कृतीचे संवर्धन व्हावे या उद्देशाने बोगद्यावर विविध लोकसंस्कृतीची चित्रे रेखाटण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे.



निसर्गरम्य असा इगतपुरी परिसर पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जातोच, पण त्याचवेळी इगतपुरीमध्ये सर्वात मोठे विपश्यना केंद्र आहे. त्यामुळे एका बोगद्यावर विपश्यना ध्यानसाधनेची माहिती चित्रकलेच्या माध्यमातून देण्यात आली आहे. तर एका बोगद्यावर लोकजीवन, शेतीव्यवसाय आदीची चित्रे रेखाटण्यात आली आहेत. लोकसंस्कृतीची अनुभूती देण्याचा, लोकसंस्कृतीचे संवर्धन करून बोगद्याच्या सौंदर्यात भर घालण्याच्या आणि प्रवाशांचा प्रवास एका वेगळ्या अुनुभूतीसह करण्याच्या उद्देशाने बोगदे चित्रांनी सजविण्यात आल्याचे एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Marathi Cinema Screen Issue: मराठी सिनेमाचे अतिरिक्त शोज मल्टीप्लेक्समध्ये लागणार! शासनाचा सर्वात मोठा निर्णय

मराठी सिनेमा जगविण्यासाठी आणि वाढवण्यासाठी राज्य सरकार सुचवणार उपाययोजना मुंबई: मराठी सिनेमांना

'यात्री ॲप'वर करा एसटीचे बुकींग!

मुंबई : चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप

माधुरीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार - मुख्यमंत्री मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि.

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक

पुण्यात भीषण अपघात: रक्षाबंधनाच्या आधीच बहीण-भावाची ताटातूट, तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे : पुण्यामध्ये एका धक्कादायक अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्याची बहीण गंभीर जखमी झाली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय मंजूर

मुंबई : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.