मालवणी लेखकांनी लिहिलेल्या दोन पुस्तकांचे मुंबईत प्रकाशन

मुंबई : मालवणी लेखकांनी लिहिलेल्या दोन पुस्तकांचे मुंबईत प्रकाशन झाले. हा प्रकाशन सोहळा कांदिवली येथील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स क्लब येथे झाला. या सोहळ्याला प्रसिद्ध लेखक प्रभाकर भोगले आणि मुंबईच्या इतिहासाचे अभ्यासक तसेच अज्ञात मुंबई या बहुचर्चित पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सिंधुदुर्ग प्रतिष्ठानच्यावतीने मालवणी बोली संवर्धन आणि प्रसार करण्याच्या उपक्रमांतर्गत पुस्तक प्रकाशन सोहळा मुंबईत झाला.



प्रकाश सरवणकर यांनी लिहिलेल्या 'गजालीतली माणसं' आणि पूर्णिमा गावडे – मोरजकर यांनी लिहिलेल्या 'गजाल गाथण' या दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले. प्रकाशन सोहळ्याला रसिक वाचक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी पोर्णिमा मोरजकर यांचे पती कल्पेश मोरजकर, भाऊ दिपक गावडे, आनंद गावडे, तसेच अनुकल्प मोरजकर, कृतिका मोरजकर, अथर्व गावडे उपस्थित होते.



मालवणी लेखिका पूर्णिमा गावडे मोरजकर या रोणापाल (ता. सावंतवाडी) गावच्या सुकन्या असून मडुरा हायस्कूलच्या माजी विद्यार्थी आहेत. आतापर्यंत त्यांनी विविध विषयांवर मालवणी भाषेत लेखन केले आहे. या कामात त्यांना वडिलांचे अर्थात माजी सरपंच प्रकाश गावडे यांचे कायम प्रोत्साहन मिळाल्याचे पूर्णिमा गावडे यांनी सांगितले.
Comments
Add Comment

राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा होणार उपलब्ध

मुंबई : कर्करोगाचे वाढते प्रमाण व कर्करोग उपचाराचे गांभीर्य विचारात घेता राज्यातील जनतेस सर्वसमावेशक कर्करोग

महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे निर्देश

मुंबई : देशभरातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी

डिजिटल गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ, सेक्सटॉर्शन आणि सायबर बुलिंगमधून मुंबईकरांची १२७ कोटींची लूट

मुंंबई: सेक्सटॉर्शन आणि सायबर बुलिंगमुळे मुंबईकरांना १२७ कोटी रुपयांना लुबाडले असल्याचा आकडा पोलीस तपासातून

महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ अतिरिक्त उपनगरी गाड्या

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन २०२५ निमित्त प्रवाशांच्या

ज्येष्ठांचा सन्मान करून साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांप्रती बांधिलकी जपणारा

मुंबईतील पाणी कपात घेतली मागे, काय आहे कारण..

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम प्रस्तावित आहे.