Crime : दोघात तिसऱ्याचा बळी! दुखावला गेलेल्या प्रियकराने केली मित्राची हत्या

  57

चंदीगड : प्रियसीने बोलणं बंद केलं म्हणून प्रियकर दुखावला गेला. या अबोल्याच्या धाग्यात प्रियकराने स्वतःच्या मित्रावर संशय घेऊन त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना पंजाबमध्ये घडली आहे. गर्लफ्रेंडने बोलणं बंद केल्यामुळे प्रियकराने स्वतःच्या मित्रावर संशय घेत मित्राची हत्या केली. आणि त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.



पंजाबमधील पठाणकोट येथे राहणारा बलजीत सिंग ४ जानेवारीला अचानक बेपत्ता झाला. बराच शोध घेऊनही त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पण, चौकशी करूनही बलजीतचा पत्ता लागला नाही. दरम्यान तपास करत असताना पोलिसांच्या खबऱ्याकडून रावी नदीत मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात या व्यक्तीची हत्या झाल्याचे पोलिसांवी सांगितलं. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला. अशातच पोलिसांचा बलजीतच्या मित्रावर संशय आला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपल्या दोन साथीदारांसोबत मिळून बलजीतचा खून केल्याची कबुली दिली. आणखी दोघांची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

Comments
Add Comment

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा; राज्याच्या मंत्र्यांची केंद्राकडे ठोस मागणी

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा नवी दिल्ली: महाराष्ट्रातील शेतकरी मोठया प्रमाणावर कांदा पिकाचे

Tahawwur Rana : हो, २६/११ हल्ला झाला तेव्हा मी पाकिस्तानचा विश्वासू एजंट होतो... मास्टरमाइंड तहव्वुर राणाची कबुली

मुंबई: २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा याने चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

Nishikant Dubey : महाराष्ट्राबाहेर या, आपटून आपटून मारु...; भाजपच्या खासदार निशिकांत दुबेंचा 'ठाकरे बंधूंवर' हल्लाबोल

बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार असाल, तर... नवी दिल्ली : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि

हिमाचलमध्ये पावसाचा कहर; ढगफुटी आणि पूरामुळे आतापर्यंत ७८ जणांचा मृत्यू

शिमला : हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आतापर्यंत राज्यात २३

गुरुग्राममध्ये साकारणार भारतातील पहिले ‘डिस्नीलँड’

नवी दिल्ली : हरियाणा सरकारने देशातील पहिले ‘डिस्नीलँड-शैली’चे थीम पार्क गुरुग्रामजवळ उभारण्याचा

अमरनाथ यात्रेत ५० हजार भाविकांनी घेतले दर्शन

जम्मू :अमरनाथ यात्रेच्या पहिल्या ४ दिवसांत ५० हजारांहून अधिक भाविकांनी पवित्र गुहेतील बर्फाच्या शिवलिंगाचे