Crime : दोघात तिसऱ्याचा बळी! दुखावला गेलेल्या प्रियकराने केली मित्राची हत्या

चंदीगड : प्रियसीने बोलणं बंद केलं म्हणून प्रियकर दुखावला गेला. या अबोल्याच्या धाग्यात प्रियकराने स्वतःच्या मित्रावर संशय घेऊन त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना पंजाबमध्ये घडली आहे. गर्लफ्रेंडने बोलणं बंद केल्यामुळे प्रियकराने स्वतःच्या मित्रावर संशय घेत मित्राची हत्या केली. आणि त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.



पंजाबमधील पठाणकोट येथे राहणारा बलजीत सिंग ४ जानेवारीला अचानक बेपत्ता झाला. बराच शोध घेऊनही त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पण, चौकशी करूनही बलजीतचा पत्ता लागला नाही. दरम्यान तपास करत असताना पोलिसांच्या खबऱ्याकडून रावी नदीत मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात या व्यक्तीची हत्या झाल्याचे पोलिसांवी सांगितलं. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला. अशातच पोलिसांचा बलजीतच्या मित्रावर संशय आला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपल्या दोन साथीदारांसोबत मिळून बलजीतचा खून केल्याची कबुली दिली. आणखी दोघांची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे