Tirupati Stampede: टोकन वाटायला सुरूवातही झाली नाही आणि चेंगराचेंगरी सुरू...जाणून घ्या काय घडलं नेमकं

नवी दिल्ली: आंध्र प्रदेशातील तिरूपती देवस्थान हे भारतातील इतर देवस्थानांपैकी एक मोठे भक्तीमय स्थान आहे. येथे बुधवारी रात्री चेंगराचेंगरी(Tirupati Stampede) झाली. या चेंगराचेंगरीत ६ लोकांचा मृत्यू झाला. खरंतर तिरूपती मंदिराच्या विशेष वैकुंठ द्वार दर्शनसाठी ८ ठिकाणी टोकन काऊंटर बनवण्यात आले होते. या दरम्यान बैरागी पट्टेदा आणि एमजीएम स्कूलच्या काऊंटवर गोंधळ झाला. येथे हजारोच्या संख्येने गर्दी होती. या चेंगराचेंगरीत अनेक लोक दबले गेले. यात ६ जणांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जण जखमी झाले. या मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.


तिरूपती मंदिरात झालेल्या दुर्घटनेत २५ जण जखमी झाले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या अपघाताप्रकरणी दु:ख व्यक्त केले. टोकन घेण्यासाठी बनवण्यात आलेल्या केंद्रांवर टोकन वाटण्यास सुरूवातही केली नव्ही. मात्र त्याआधीच चेंगराचेंगरी झाली आणि इतकी मोठी दुर्घटना घडली. आज सकाळी १० वाजता चंद्राबाबू नायडू जखमींची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचतील.



टोकन घेण्यासाठी रात्रीपासूनच गर्दी


दर वर्षी वैकुंठ एकादशीला तिरूपती वैकुंठ द्वार दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी उसळते. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या काळात तिरूपती दर्शनसाठी येतात. यावेळेस वैकुंठ द्वार दर्शन १० जानेवारी ते १९ जानेवारीदरम्यान होत आहे. यासाठी टोकन वाटण्याची व्यवस्था करण्यात आली होती. टोकन ९ जानेवारीला सकाळी वाटले जाणार होते. यासाठी ८ जानेवारीच्या रात्रीपासूनच लोकांची मोठी गर्दी जमली होती. मात्र टोकन वाटलेही गेले नाही आणि त्याआधीच ही दुर्घटना घडली.



पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दु:ख


पंतप्रधान मोदींनी या घटनेप्रकरणी ट्वीट करत दु:ख व्यक्त केले आहे.


 


१० जानेवारीपासून सुरू होणार दर्शन


वैकुंठ द्वार दर्शन १० ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान होणार आहे. प्रोटकॉलनुसार १० जानेवारीला दर्शन सकाळी साडेचार वाजल्यापासून सुरू होती.

Comments
Add Comment

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या