Tirupati Stampede: टोकन वाटायला सुरूवातही झाली नाही आणि चेंगराचेंगरी सुरू...जाणून घ्या काय घडलं नेमकं

नवी दिल्ली: आंध्र प्रदेशातील तिरूपती देवस्थान हे भारतातील इतर देवस्थानांपैकी एक मोठे भक्तीमय स्थान आहे. येथे बुधवारी रात्री चेंगराचेंगरी(Tirupati Stampede) झाली. या चेंगराचेंगरीत ६ लोकांचा मृत्यू झाला. खरंतर तिरूपती मंदिराच्या विशेष वैकुंठ द्वार दर्शनसाठी ८ ठिकाणी टोकन काऊंटर बनवण्यात आले होते. या दरम्यान बैरागी पट्टेदा आणि एमजीएम स्कूलच्या काऊंटवर गोंधळ झाला. येथे हजारोच्या संख्येने गर्दी होती. या चेंगराचेंगरीत अनेक लोक दबले गेले. यात ६ जणांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जण जखमी झाले. या मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.


तिरूपती मंदिरात झालेल्या दुर्घटनेत २५ जण जखमी झाले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या अपघाताप्रकरणी दु:ख व्यक्त केले. टोकन घेण्यासाठी बनवण्यात आलेल्या केंद्रांवर टोकन वाटण्यास सुरूवातही केली नव्ही. मात्र त्याआधीच चेंगराचेंगरी झाली आणि इतकी मोठी दुर्घटना घडली. आज सकाळी १० वाजता चंद्राबाबू नायडू जखमींची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचतील.



टोकन घेण्यासाठी रात्रीपासूनच गर्दी


दर वर्षी वैकुंठ एकादशीला तिरूपती वैकुंठ द्वार दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी उसळते. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या काळात तिरूपती दर्शनसाठी येतात. यावेळेस वैकुंठ द्वार दर्शन १० जानेवारी ते १९ जानेवारीदरम्यान होत आहे. यासाठी टोकन वाटण्याची व्यवस्था करण्यात आली होती. टोकन ९ जानेवारीला सकाळी वाटले जाणार होते. यासाठी ८ जानेवारीच्या रात्रीपासूनच लोकांची मोठी गर्दी जमली होती. मात्र टोकन वाटलेही गेले नाही आणि त्याआधीच ही दुर्घटना घडली.



पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दु:ख


पंतप्रधान मोदींनी या घटनेप्रकरणी ट्वीट करत दु:ख व्यक्त केले आहे.


 


१० जानेवारीपासून सुरू होणार दर्शन


वैकुंठ द्वार दर्शन १० ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान होणार आहे. प्रोटकॉलनुसार १० जानेवारीला दर्शन सकाळी साडेचार वाजल्यापासून सुरू होती.

Comments
Add Comment

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे

बिलासपूरमध्ये भूस्खलनाचा भीषण अपघात; बसवर दरड कोसळल्याने १५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, बचाव कार्य सुरू

बिलासपूर: हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर

दिवाळी-छटसाठी देशभरात धावणार १२ हजार विशेष गाड्या

नवी दिल्ली  : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार यंदा दिवाळी आणि छट यांसारख्या सणांच्या