Tirupati Stampede: टोकन वाटायला सुरूवातही झाली नाही आणि चेंगराचेंगरी सुरू...जाणून घ्या काय घडलं नेमकं

नवी दिल्ली: आंध्र प्रदेशातील तिरूपती देवस्थान हे भारतातील इतर देवस्थानांपैकी एक मोठे भक्तीमय स्थान आहे. येथे बुधवारी रात्री चेंगराचेंगरी(Tirupati Stampede) झाली. या चेंगराचेंगरीत ६ लोकांचा मृत्यू झाला. खरंतर तिरूपती मंदिराच्या विशेष वैकुंठ द्वार दर्शनसाठी ८ ठिकाणी टोकन काऊंटर बनवण्यात आले होते. या दरम्यान बैरागी पट्टेदा आणि एमजीएम स्कूलच्या काऊंटवर गोंधळ झाला. येथे हजारोच्या संख्येने गर्दी होती. या चेंगराचेंगरीत अनेक लोक दबले गेले. यात ६ जणांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जण जखमी झाले. या मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.


तिरूपती मंदिरात झालेल्या दुर्घटनेत २५ जण जखमी झाले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या अपघाताप्रकरणी दु:ख व्यक्त केले. टोकन घेण्यासाठी बनवण्यात आलेल्या केंद्रांवर टोकन वाटण्यास सुरूवातही केली नव्ही. मात्र त्याआधीच चेंगराचेंगरी झाली आणि इतकी मोठी दुर्घटना घडली. आज सकाळी १० वाजता चंद्राबाबू नायडू जखमींची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचतील.



टोकन घेण्यासाठी रात्रीपासूनच गर्दी


दर वर्षी वैकुंठ एकादशीला तिरूपती वैकुंठ द्वार दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी उसळते. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या काळात तिरूपती दर्शनसाठी येतात. यावेळेस वैकुंठ द्वार दर्शन १० जानेवारी ते १९ जानेवारीदरम्यान होत आहे. यासाठी टोकन वाटण्याची व्यवस्था करण्यात आली होती. टोकन ९ जानेवारीला सकाळी वाटले जाणार होते. यासाठी ८ जानेवारीच्या रात्रीपासूनच लोकांची मोठी गर्दी जमली होती. मात्र टोकन वाटलेही गेले नाही आणि त्याआधीच ही दुर्घटना घडली.



पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दु:ख


पंतप्रधान मोदींनी या घटनेप्रकरणी ट्वीट करत दु:ख व्यक्त केले आहे.


 


१० जानेवारीपासून सुरू होणार दर्शन


वैकुंठ द्वार दर्शन १० ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान होणार आहे. प्रोटकॉलनुसार १० जानेवारीला दर्शन सकाळी साडेचार वाजल्यापासून सुरू होती.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव