Sea-link between Versova-Virar : वर्सोवा- विरार दरम्यान होणार सी- लिंक रोड

मुंबई : वर्सोवा ते विरार हे अंतर कमी करण्यासाठी राज्य सरकार एक मास्टर प्लॅन तयार करत आहे.यामुळे दोन ते तीन तासांचे हे प्रवासाचे अंतर पाऊणतासात पार करता येणार आहे. एमएमआरडीएने उत्तन ते विरारपर्यंतचा ५५ किमीवर लिंक रोड बनवण्यासाठी प्लान तयार केला आहे. त्यामध्ये २४ किमी लांबीचा सी-लिंक असेल. हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर वर्सोवा ते विरार हे अंतर फक्त ४५ मिनिटात पूर्ण होईल. म्हणजेच प्रवाशांचा जवळपास सव्वातास वाचणार आहे. हा ५५ किमी लांबीचा लिंक रोड बीएमसीद्वारे तयार करण्यात आलेल्या कोस्टल रोडला जोडला जाणार आहे. त्यामुळे वाहतूक अधिक वेगवान होईल.



मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीने उत्तन (भाईंदर) ते विरार दरम्यान ५५ किमी लांब नवीन लिंक रोडसाठी मास्टर प्लान तयार केला आहे. पाच पदरी आणि १९.१ मीटर रूंद लिंक रोडची निर्मिती होणार आहे. या प्रकल्‌पाला लवकरच मंजुरी मिळेल, या नव्या रस्त्याचा आराखडा (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. सध्या डीपीआरच्या आढाव्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. या प्रकल्‌पामुळे कोस्टल रोडला कनेक्टिविटी मिळेल. हे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वर्सोवा ते विरार हा प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण करणे शक्य होईल, असे एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी यांनी माध्यमांना सांगितले आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील खासगी कोचिंग क्लासना लावणार चाप! तपासणीसाठी समिती गठित

मुंबई : मुंबई शहरात सुरू असलेल्या खासगी कोचिंग क्लासची तपासणी करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने सर्व संबधित

गौतमी पाटील आणि अभिजीत सावंत यांचं नेमकं चाललंय तरी काय?

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात सध्या एक नव्या जोडीची चर्चा रंगली आहे ‘इंडियन आयडॉल’ फेम अभिजीत सावंत आणि लोकप्रिय

शिल्पा शेट्टीच्या आईची तब्येत अचानक बिघडली, लीलावती रुग्णालयात दाखल...

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईच्या लीलावती

जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा : ‘अभंग तुकाराम’

मुंबई : महाराष्ट्राला संत-महात्म्यांची उज्ज्वल परंपरा आहे. माऊलींच्या ज्ञानेश्वरीने महाराष्ट्राच्या

सेमीफायनल सामन्यात काळी पट्टी बांधून खेळतायेत खेळाडू... कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे.

ताम्हिणी घाटात भीषण अपघात, दरड गाडीवर कोसळल्याने महिलेचा मृत्यू!

रायगड: सनरुफ असलेल्या आलिशान चारचाकीवर दरड कोसळल्याची घटना पुणे-माणगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात घडली आहे. ही