Kalyan Accident : धक्क्कादायक! आईसोबत शाळेतून घरी जाताना रस्ता ओलांडला अन् भरधाव ट्रकने जागीच...

कल्याण : कल्याणमधील लाल चौकी परिसरात आई आणि लहान मुलाला एका ट्रकने उडवल्याची घटना समोर आली आहे. या भीषण दुर्घटनेत आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. कल्याणमधील लाल चौकी परिसरात हा धक्कादायक अपघात घडला. यावेळी आई आपल्या मुलाला शाळा सुटल्यानंतर घरी घेऊन जात होती. त्यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कचरा आणि माती वाहून नेणाऱ्या ट्रकने मायलेकराला उडवले. आई आणि मुलाचा या धडकेत जागीच मृत्यू झाला. या अपघाती ट्रकचा इन्शुरन्स संपलेला होता. या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे.



या अपघातानंतर तातडीने पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. महिला आपल्या मुलासह रस्ता ओलांडत असताना हा अपघात घडला आहे. निशा सोमेसकर आणि अंश सोमेसकर असे मृत आई आणि मुलाचे नाव आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिक संतप्त झालेले पाहायला मिळाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांना तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन निशा सोमेसकर आणि अंश सोमेसकर यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. सध्या पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे. या अपघातामधील ट्रक कल्याण डोंबविली महानगरपालिकेचा होता. मात्र, या अपघातानंतर महानगरपालिकेचा एकही अधिकारी याठिकाणी फिरकला नाही. याविरोधात माजी आमदार प्रकाश भोईर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडत रास्ता रोको आंदोलन केलं.

Comments
Add Comment

फक्त ९५ चेंडूत १७१ धावा करणारा वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही

मुंबई : भारताच्या वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत यूएई विरुद्ध ९५ चेंडूत १७१ धावा केल्या. ही

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसंग्राम लढणार

मुंबई : मुंबई, ठाणे, भिवंडी आणि नवी मुंबई येथील शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत

पुण्यात राजगुरूनगरमध्ये कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्याचा मित्रावर चाकूने हल्ला; मित्राचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे : शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळख मिरवणाऱ्या पुण्याची प्रतिमा वाढत्या गुन्हेगारीमुळे मलिन होऊ लागली आहे. ताजी

अखेर प्रतीक्षा संपली! मुंबई, पुणे, नागपूरसह २९ शहरांत 'इलेक्शन'चा धुराळा; निकाल कधी ? वाचा सविस्तर

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या राज्यातील २९

खलनायक अक्षय खन्नाच्या भूमिकेचा जलवा, ‘धुरंधर’ने मोडले ‘छावा’-‘पुष्पा २’चे रेकॉर्ड

मुंबई : ‘छावा’ आणि ‘पुष्पा २’नंतर बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा मोठा भूकंप घडवणारा सिनेमा म्हणजे ‘धुरंधर’. आदित्य धर

धक्कादायक! गुंडांनी केला थेट पोलिसांवर हल्ला, मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कांदिवली: मुंबईच्या कांदिवलीमधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस