Kalyan Accident : धक्क्कादायक! आईसोबत शाळेतून घरी जाताना रस्ता ओलांडला अन् भरधाव ट्रकने जागीच...

कल्याण : कल्याणमधील लाल चौकी परिसरात आई आणि लहान मुलाला एका ट्रकने उडवल्याची घटना समोर आली आहे. या भीषण दुर्घटनेत आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. कल्याणमधील लाल चौकी परिसरात हा धक्कादायक अपघात घडला. यावेळी आई आपल्या मुलाला शाळा सुटल्यानंतर घरी घेऊन जात होती. त्यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कचरा आणि माती वाहून नेणाऱ्या ट्रकने मायलेकराला उडवले. आई आणि मुलाचा या धडकेत जागीच मृत्यू झाला. या अपघाती ट्रकचा इन्शुरन्स संपलेला होता. या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे.



या अपघातानंतर तातडीने पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. महिला आपल्या मुलासह रस्ता ओलांडत असताना हा अपघात घडला आहे. निशा सोमेसकर आणि अंश सोमेसकर असे मृत आई आणि मुलाचे नाव आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिक संतप्त झालेले पाहायला मिळाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांना तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन निशा सोमेसकर आणि अंश सोमेसकर यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. सध्या पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे. या अपघातामधील ट्रक कल्याण डोंबविली महानगरपालिकेचा होता. मात्र, या अपघातानंतर महानगरपालिकेचा एकही अधिकारी याठिकाणी फिरकला नाही. याविरोधात माजी आमदार प्रकाश भोईर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडत रास्ता रोको आंदोलन केलं.

Comments
Add Comment

Rajasthan Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने राजस्थान हादरले

शनिवार ७ मार्च रोजी सकाळी राजस्थानमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५

प्राइम व्हिडिओने ‘एस्पिरेंट्स’ सीझन ३ चा दमदार ट्रेलर रिलीज; जुन्या मैत्री आणि नव्या सत्तेमधील संघर्ष उलगडणार

मुंबई : ‘द वायरल फीवर’ (TVF) निर्मित ‘एस्पिरेंट्स’ सीझन ३  चे दिग्दर्शन दीपेश सुमित्रा जगदीश यांनी केले आहे. या

Nashik Earthquake : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण

पश्चिम रेल्वेच्या ४ विशेष सुपरफास्ट गाड्या!

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे, अहमदाबाद,

टाटा हॉस्पिटलचा कॅन्सरविरुद्ध डिजिटल लढा

मुंबई (प्रतिनिधी) : कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे प्रमाण पाहता, भारतातील कोट्यवधी लोकांची तपासणी करणे

मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकरांची लाखोंची फसवणूक; नक्की घडलं तरी काय ?

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्ष उसगावकर यांची लाखोंची फसवणूक झाल्याची बातमी समोर आली आहे.