Kalyan Accident : धक्क्कादायक! आईसोबत शाळेतून घरी जाताना रस्ता ओलांडला अन् भरधाव ट्रकने जागीच...

  110

कल्याण : कल्याणमधील लाल चौकी परिसरात आई आणि लहान मुलाला एका ट्रकने उडवल्याची घटना समोर आली आहे. या भीषण दुर्घटनेत आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. कल्याणमधील लाल चौकी परिसरात हा धक्कादायक अपघात घडला. यावेळी आई आपल्या मुलाला शाळा सुटल्यानंतर घरी घेऊन जात होती. त्यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कचरा आणि माती वाहून नेणाऱ्या ट्रकने मायलेकराला उडवले. आई आणि मुलाचा या धडकेत जागीच मृत्यू झाला. या अपघाती ट्रकचा इन्शुरन्स संपलेला होता. या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे.



या अपघातानंतर तातडीने पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. महिला आपल्या मुलासह रस्ता ओलांडत असताना हा अपघात घडला आहे. निशा सोमेसकर आणि अंश सोमेसकर असे मृत आई आणि मुलाचे नाव आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिक संतप्त झालेले पाहायला मिळाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांना तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन निशा सोमेसकर आणि अंश सोमेसकर यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. सध्या पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे. या अपघातामधील ट्रक कल्याण डोंबविली महानगरपालिकेचा होता. मात्र, या अपघातानंतर महानगरपालिकेचा एकही अधिकारी याठिकाणी फिरकला नाही. याविरोधात माजी आमदार प्रकाश भोईर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडत रास्ता रोको आंदोलन केलं.

Comments
Add Comment

Tata Hospital : भारतात टाटा रुग्णालयामध्ये प्रथमच एमआयबीजी पद्धतीचा वापर, न्यूरोब्लास्टोमा रुग्णाचा जीव वाचला...

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून न्यूरोब्लास्टोमा (Neuroblastoma) कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होतं आहे. यापूर्वी अनेक

झिशान सिद्दीकी यांच्यावर पाळत ठेवणाऱ्या संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन सोडले

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते झिशान सिद्दीकी यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून

अलिबाग-वडखळ महामार्गावर खड्डेच खड्डे; लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

अलिबाग : अतिवृष्टीमुळे अलिबाग-वडखळ या राष्ट्रीय महामार्गावर केलेली तात्पुरती मलमपट्टी उखडून गेल्याने या

कोकण किनारपट्टीला ३.५ ते ४.५ मीटर उंच लाटांचा इशारा

मुंबई : रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर

व्यायाम केल्यानंतर ही चूक कधीही करू नका ...

मुंबई : फिटनेस जपण्यासाठी चालणे, धावणे, जिम करणे या पद्धतीने घाम गाळण्यावर हल्ली अनेकांचा भर असतो. व्यायाम केला की

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या