Crime News : चोरीचा अजब प्रकार! काहीच न सापडल्यानं महिलेची पप्पी घेऊन चोर पळाला

मुंबई : मालाड (Mumbai ) येथील कुरार भागात एक विचित्र आणि संतापजनक घटना (Crime News) घडली आहे. चोरीसाठी घरात घुसलेल्या चोरट्याला काहीही मौल्यवान वस्तू सापडल्या नाहीत, म्हणून त्याने घरात असलेल्या महिलेचं चुंबन घेतलं आणि तिथून पळ काढला. या प्रकरणात महिलेने तातडीने मालाडच्या कुरार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी परिसरातले सीसीटीव्ही पाहून चोराला अटक केली आहे.


कुरार परिसरातील एक ३८ वर्षीय महिला घरी एकटीच होती. चोरीच्या उद्देशाने चोर घरात शिरला आणि घरातील मौल्यवान वस्तू, रोख रक्कम शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीही हाती न लागल्याने, चोरट्याने महिलेची पप्पी घेतली आणि पळून गेला. ही घटना ३ जानेवारी रोजी घडली.


महिलेच्या तक्रारीनुसार, चोरट्याने घराचा दरवाजा आतून बंद केला आणि महिलेला धाक दाखवून मौल्यवान वस्तू, मोबाइल, रोख रक्कम, किंवा एटीएम कार्ड देण्याची मागणी केली. परंतु घरात अशा वस्तू नसल्याचं महिलेने सांगितल्यानंतर चोराने हे अजब कृत्य केलं.



महिलेच्या तक्रारीनंतर कुरार पोलिसांनी तपास सुरू केला आणि चोराला अटक केली. संबंधित चोर मालाड भागातच आपल्या कुटुंबासोबत राहतो आणि बेरोजगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


दरम्यान, त्याचा कोणताही पूर्वगुन्हेगारी रेकॉर्ड नाही. परंतु त्याच्याविरोधात महिलेच्या विनयभंगाचा आणि दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महिलेने दाखवलेली तत्परता आणि तक्रारीमुळे आरोपीला वेळीच अटक करण्यात यश आलं.


या घटनेचा पुढील तपास सुरू आहे, असं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, या प्रकाराने स्थानिकांमध्ये चोरट्यांच्या विकृत मानसिकतेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

भिवंडीमध्ये मानवतेला काळीमा; कॅन्सरशी झुंज देणाऱ्या पत्नीवर हुंड्यासाठी ......, पतीसह सात आरोपींवर गुन्हा

भिवंडी : कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यात उपचार सुरू असताना एका महिलेवर हुंड्याच्या हव्यासापोटी अमानुष छळ

Mumbai Vileparle : मुंबईकरांच्या पार्ले-जीचा सुगंध आता कायमचा हरवणार! ८७ वर्षांचा पार्ले-जीचा कारखाना होणार जमीनदोस्त; नेमकं कारण काय ?

मुंबई : मुंबईच्या विलेपार्ले (पूर्व) परिसरातील ज्या कारखान्यामुळे या उपनगराला एक वेगळी ओळख मिळाली, तो पार्ले

77th Republic Day : ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, संविधानातील नियमांचा रोजच्या जीवनातील महत्व आणि ताकद जाणून घ्या

मुंबई : २६ जानेवारी हा दिवस भारताच्या लोकशाही प्रवासातील निर्णायक टप्पा मानला जातो. १९५० साली याच दिवशी भारतीय

युनेस्को दर्जाप्राप्त गडकिल्ल्यांची स्वच्छता आणि संवर्धन मोहीम

पर्यटन वाढीमुळे निर्माण झालेल्या कचऱ्यावर आळा मुंबई : युनेस्कोचा जागतिक वारसास्थळाचा दर्जा प्राप्त झालेल्या

प्रभाकर शिंदे ‘स्थायी’, तर खणकर सभागृह नेता?

मुंबई : मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेना महायुतीचा महापौर बसणार हे आता जवळपास निश्चित झाले असून तसे झाल्यास सभागृह

एमपीएड, एमएड सीईटीच्या प्रवेश नोंदणीला १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) घेण्यात येणाऱ्या मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन (एमपीएड)