
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता तोंडावर आल्या असून, सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा भाजपासोबत युती करेल, अशा चर्चा रंगल्या आहेत.
यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मंगळवारी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आगामी बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीसह राज्यातील १६ महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसोबत युती करण्याबाबत समन्वय समिती स्थापन करून नियोजन करण्याबाबत चर्चा आहे. अशातच भाजपाचे मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीमुळे (Ashish Shelar meets Raj Thackeray) भाजपा आणि मनसे युतीच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत.

मुंबई : टोरेस (Torres) या ज्वेलरी कंपनीने मुंबईतील हजारो गुंतवणूकदारांना करोडो रुपयांचा गंडा घातला आहे. या कंपनीने सोने, चांदी आणि मोइसॅनाइट स्टोनवर ...
'आशिष शेलार आणि राज ठाकरे यांची भेट ही महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने सदिच्छा भेट होती. आशिष शेलार आता मंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या विभागांतर्गत काही चर्चा झालेली असू शकते. आताच विधानसभा निवडणुका झाल्यात. आपलं नवीन सरकार बसलेले आहेत. त्यामुळे राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची केवळ सदिच्छा भेट होती, इतकाच अर्थ आहे. यात दुसरा कोणताही अर्थ नाही,' असे भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले.