HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये; लवकरच सरकार जाहीर करणार प्रतिबंधात्मक उपायांसाठी मार्गदर्शक तत्वे

मुंबई : कोरोना महामारीनंतर आता पुन्हा एकदा जग एचएमपीव्ही व्हायरसच्या विळख्यात सापडले आहे. ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) या चीनमधील व्हायरसमुळे (HMPV virus) पुन्हा एकदा जगाची चिंता वाढली आहे. त्यातच नागपूरमध्ये दोन लहान मुलांना या व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रात ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) व्हायरसचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य विभागासह सर्व संबंधित अधिका-यांशी ऑनलाईन चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे.


राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ऑनलाईन पध्दतीने संवाद साधणार आहेत.


सोमवारी बंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळून आले. त्यानंतर आता नागपुरातही एचएमपीव्हीची लागण झालेले दोन रुग्ण आढळले आहेत. सात वर्षांचा मुलगा आणि १३ वर्षांच्या मुलीला HMPV ची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य विभागसह सर्व प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.



मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला कार्यालये स्वच्छ ठेवणे, औषधे, ऑक्सिजन आणि विलगीकरण सुविधा तयार ठेवणे यासारख्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांना लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी तत्पर राहण्याचे आणि प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.


आरोग्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी हा आजार गंभीर नसल्याचे स्पष्ट केले आहे, मात्र लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि इतर गंभीर आजार असणा-यांनी काळजी घ्यावी. राज्यात सध्या HMPV संसर्गाचा एकही नवा रुग्ण नाही. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.


सरकार लवकरच प्रतिबंधात्मक उपायांसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर करणार आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सावध राहण्याचे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


दरम्यान, १०० दिवसात प्राधान्याने करावयाची कामे याबाबत आढावा घेतला जाणार आहे. विभागासोबत आता स्थानिक कार्यालयांना सुद्धा १०० दिवसांचे टार्गेट दिले जाणार असल्याची माहिती आहे. आपल्या वेबसाईट सुसज्ज करा, माहिती अधिकारात मागितली जाते, अशी सर्व माहिती त्यावर आधीच टाका, ती संकेतस्थळे सायबरदृष्ट्या सुरक्षित करा. कार्यालयांची सफाई करा, अनावश्यक कागदांचे ढीग रिकामे करा. वाहनांचे भंगार साफ करा. कार्यालय स्वच्छ ठेवा. पिण्याचे पाणी, सार्वजनिक प्रसाधनगृह स्वच्छ राहतील, हे सुनिश्चित करा. अधिका-यांच्या सरप्राइज भेटी होतील, त्यावेळी ते स्वच्छ दिसले पाहिजे. इज ऑफ लिव्हिंग लक्षात घेता किमान २ सुधारणा, नावीन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत.


त्याचबरोबर पेंडिंग कामांची संख्या शून्यावर कशी येईल, याचा प्रयत्न करा. सामान्य माणूस कोणत्या वेळेत भेटायला येऊ शकतो, त्याची सुस्पष्ट माहिती पाटीवर नमूद करा. ९० टक्के बाबी स्थानिक पातळीवर सुटू शकतात. पण ते होत नाही, म्हणून मंत्रालयात गर्दी होते. लोकशाही दिनसारखे उपक्रम राबवा. गुंतवणुकीसाठी लोक येतात, तेव्हा त्यांना कुणीही त्रास देत नाही, हे सुनिश्चित करा. हे केवळ उद्योग विभागाचे काम नाही तर क्षेत्रीय अधिकारी यांचेही काम आहे. फ्लॅगशिप कार्यक्रम/योजनांना भेटी तसेच तालुका, गाव पातळीवर भेटी झाल्याच पाहिजेत. शाळा, अंगणवाडी आणि आरोग्य केंद्र येथे भेटी झालेच पाहिजे. ही सर्व कामे होत आहेत की नाही, याकडे पालक सचिवांनी लक्ष घालावे असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.


Comments
Add Comment

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल