देशातून २०२६ पर्यंत नक्षलवाद नष्ट करू - अमित शाह

छत्तीसगडमधील आयईडी ब्लास्टनंतर दिली प्रतिक्रिया


नवी दिल्ली : भारतातून मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करून असा पुनरूच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. छत्तीसगडच्या दंतेवाडात सोमवारी झालेल्या आयईडी ब्लास्टमध्ये ८ जवान आणि एक वाहन चालक असा 9 जणांचा बळी गेला. या घटनेवर शाह यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली आहे.

नक्षलवाद्यांच्या विरोधात संयुक्‍त मोहिम राबवून परतताना दंतेवाडामध्‍ये नक्षल्यांनी घातपात घडवला. स्थानिक कुत्रु-बेद्रे रस्त्यावर नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट करून सुरक्षा दलाचे वाहन उडवले. हा भ्याड हल्ला सोमवारी दुपारी २.१५ वाजता झाला. यामध्ये दंतेवाडा डीआरजीचे ८ जवान आणि एक ड्रायव्हर यांना वीर मरण आले.


या घटनेसंदर्भात ट्विटरवर (एक्स) प्रतिक्रिया देताना शाह म्हणाले की, छत्तीसगडमधील बिजापूर येथे झालेल्या आयईडी स्फोटात डीआरजी जवानांच्या मृत्यूच्या वृत्ताने मला अत्यंत दु:ख झाले आहे. मी शूर जवानांच्या कुटुंबियांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. हे दु:ख शब्दात मांडणे अशक्य आहे. पण आपल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही याची मी खात्री देतो, असेही गृहमंत्री शाह यांनी म्हटले आहे. तसेच मार्च २०२६ पर्यंत आम्ही भारतीय भूमीतून नक्षलवाद संपवू, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

'पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही'

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडून घटस्फोटाचा निर्णय कायम जबलपूर : "कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे