गुजरातमध्ये तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टर अपघातात ३ जण ठार 

अहमदाबाद : गुजरातमधील पोरबंदर विमानतळावर तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.तर काही जण जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये दोन वैमानिकांसह तीन क्रू मेंबर्सचा समावेश आहे. ही घटना रविवारी दुपारी १२ वाजता घडली असल्याची माहिती पोरबंदरचे पोलीस अधीक्षक भगीरथसिंह जडेजा यांनी सांगितली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोस्ट गार्डचे एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर गुजरातमधील पोरबंदर येथे रविवारी नियमित प्रशिक्षण उड्डाण दरम्यान क्रॅश झाले. रविवारी दुपारी 12 वाजता कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. हेलिकॉप्टर नेहमीच्या उड्डाणावर होते आणि हेलिकॉप्टर उतरत असताना हा अपघात झाला. लँडिंग दरम्यान काही तांत्रिक बिघाड झाला.जमिनीवर आदळताच हेलिकॉप्टरला आग लागली आणि धुराचे ढग बाहेर येऊ लागले. हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिकांसह एकूण तीन जण होते. या अपघातात तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हेलिकॉप्टर टेक ऑफ दरम्यान तांत्रिक बिघाड झाला होता, त्यानंतर हेलिकॉप्टर क्रॅश झालं. या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.तसेच हा अपघात का झाला, या मागच्या कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच तटरक्षक दलाचं एक विमान समुद्रामध्ये दुर्घटनाग्रस्त झालं होतं. या अपघातानंतर काही महिन्यातच पश्चिम किनारपट्टीवर ही दुर्घटना घडली आहे.

Comments
Add Comment

अनंत अंबानींच्या भक्तीची भाविकांमध्ये चर्चा; रिलायन्स इंडस्ट्रीकडून तिरूपतीच्या बालाजी मंदिराला २७ कोटींची भेट !

तिरुपती : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आणि रिलायन्स

PM Narendra Modi : पावसाच्या पाण्याचा एक-एक थेंब वाचवा; पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन

नवी दिल्ली : प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आपल्याला जलसंचय करायचाच आहे. पावसाच्या

Historical discovery in Denmark : वायकिंग काळातील भव्य वस्त्र उत्पादन केंद्र; हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासावर नवा प्रकाश

Aarhus, Denmark : पुरातत्वशास्त्रज्ञांना डेन्मार्कमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक शोध लागला आहे. जटलँड

Kailash Mansarovar Yatra 2026 : 'कैलास मानसरोवर यात्रेत व्हिसाशिवाय प्रवास टाळा'; परराष्ट्र मंत्रालयकडून भाविकांसाठी अॅडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा सुरू झालेल्या कैलास मानसरोवर यात्रेबाबत (Kailash Mansarovar Yatra 2026)

UPSC Recruitment 2026 : केंद्र सरकारमध्ये १०५ पदांसाठी थेट भरती; कधी पर्यंत कराल अर्ज?

नवी दिल्ली : केंद्र सरकारमध्ये (Central Government) नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. युनियन पब्लिक

TET Paper Leak : ऐनवेळी टीईटीची परीक्षा रद्द! 'नीट' पाठोपाठ आता 'टीईटी' परीक्षेलाही पेपरफुटीचे ग्रहण! जाणून घ्या...

पुणे : राज्यातील लाखो डी.टी.एड (D.T.Ed) आणि बी.एड (B.Ed) धारक तरुण-तरुणींना मोठा धक्का बसला आहे. उद्या, म्हणजेच २८ जून २०२६