Yuzvendra-Dhanashree Divorce : युजवेंद्र चहल-धनश्री वर्मा यांचा घटस्फोट होणार? इन्स्टाग्रामवर एकमेकांना केलं अनफॉलो

मुंबई : भारतीय संघाचा क्रिकेटर फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी अभिनेत्री कोरिओग्राफर धनश्री वर्मा गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. चहल आणि धनश्री दोघेही एकमेकांपासून वेगळे होणार आहेत, अशी चर्चा त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे रंगली आहे. आता या चर्चेदरम्यान चहल आणि धनश्रीने एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलोसुद्धा केलं आहे.

इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर युझवेंद्रने धनश्रीबरोबरचे सर्व फोटो उडवून टाकले आहेत. त्यानंतर दोघेही एकमेकांपासून वेगळे होणार असल्याच्या चर्चांना दुजोरा मिळाला आहे. दुसरीकडे घटस्फोटाबाबत चहल आणि धनश्रीकडून अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.



मिळालेल्या माहितीनुसार, घटस्फोटाच्या अफवा खऱ्या आहेत. ते अधिकृतपणे मान्य होण्याआधी काही वेळ बाकी आहे. त्यांच्या विभक्त होण्याचे नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, परंतु हे स्पष्ट आहे की या जोडप्याने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.

२०२३ मध्ये धनश्री वर्माने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या नावामधून पती युजवेंद्रचे आडनाव ‘चहल’ काढून टाकले होते. त्यानंतर घटस्फोटाच्या अफवांना वेग आला होता. युझवेंद्रने “नवीन आयुष्य सुरू होत आहे” अशी इंस्टाग्राम स्टोरी शेअर केल्यानंतर हा बदल झाला. मात्र, त्यावेळी क्रिकेटपटूने घटस्फोटाच्या बातम्यांना अफवा असल्याचे म्हटले होते आणि चाहत्यांना अफवांवर लक्ष देऊ नका असे सांगितले होते.
Comments
Add Comment

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना

डॉ. अभिजित चौधरी 'पीएमआरडीए'चे नवे आयुक्त

मुंबई : राज्य शासनाने बुधवारी दोघा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, पुणे महानगर प्रदेश विकास

पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई, दि. ४ : - पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित

'ऊर्जा क्षेत्राला सक्षम करण्यासाठी कालबद्धरित्या प्रकल्पांची अंमलबजावणी करा'

मुंबई : राज्यात ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत असून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून उदंचन जलविद्युत

मच्छिमार आणि महिला कामगारांसाठी विश्रामगृह तातडीने खुले करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : ससून डॉक येथील मच्छिमार, महिला कामगार आणि बोटधारकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी राज्य शासन