Tamil Nadu News : तामिळनाडूमध्ये फटाका कारखाना स्फोटात ६ जणांचा मृत्यू

विरुधूनगर : तामिळनाडूच्या विरुधूनगर जिल्ह्यातील सत्तूर भागातील अप्पैया नायक्कनपट्टी येथील साईनाथ फटाका कारखान्यात मोठा स्फोट झाला आहे. या घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. विरुधूनगर येथील फटाके निर्मिती कारखान्यात आतापर्यंत ६ मृतदेह सापडले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याची माहिती अग्निशमन आणि बचाव विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.



यासंदर्भातील माहितीनुसार, स्फोटानंतर कारखान्यातील ४ खोल्या कोसळल्यात. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु फटाके तयार करताना विद्युत गळती किंवा स्फोटकांमधील घर्षणामुळे स्फोट झाला असावा असा संशय आहे. स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना वाचवण्यात आले आहे आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तामिळनाडूतील फटाका कारखान्यांमध्ये यापूर्वी देखील स्फोटाच्या घटना घडल्या आहेत. विरुधूनगर जिल्ह्यातच यापूर्वी झालेल्या २ स्फोटाच्या घटनांमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला होता. यातील पहिली घटना रंगापलयम परिसरात झाली होती. याठिकाणी फटाक्यांच्या चाचणीदरम्यान झालेल्या अपघातात १२ महिलांसह १३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी तामिळनाडू सरकारने मृतकांच्या वारसांना ३ लाख रुपये आणि जखमींच्या उपचारासाठी १ लाखांचा मतद निधी दिला होता.

Comments
Add Comment

Indian Warships in Thailand : थायलंडमध्ये भारतीय युद्धनौकांचा संयुक्त सराव; सागरी सुरक्षेसाठी वाढला समन्वय

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी

Hindu religion : धर्मांतरित हिंदूंच्या मनात जर खरी श्रद्धा असेल, तर त्यांना मंदिरात प्रवेश करण्याचा आणि पूजा करण्याचा अधिकार

नवी दिल्ली : जर एखादी व्यक्ती जन्माने हिंदू (Hindu) नसतानाही तिला मंदिरात प्रवेश नाकारला जाऊ शकतो का? याबाबत ती

थायलंडमध्ये भारतीय युद्धनौकांचा संयुक्त सराव; सागरी सुरक्षेसाठी वाढला समन्वय

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी

अरुणाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलन; १४ गावांतील ३१०० हून अधिक नागरिक बाधित

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील लोअर सियांग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या ढगफुटी आणि भूस्खलनामुळे

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला