Bangladeshi : बांगलादेशी नागरिक महाड पर्यंत पोहोचले? औद्योगिक वसाहतीमध्ये तपासणी सुरू

कारखानदार व नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे पोलिसांचे आवाहन!


महाड : देशात सध्या सुरू असलेल्या बांगलादेशातील नागरिकांच्या (Bangladeshi) संदिग्ध रहिवासाबद्दल रायगड जिल्ह्यात पनवेल परिसरात मागील चार दिवसात आढळून आलेल्या नागरिकांच्या बातम्या ताज्या असतानाच हे नागरिक महाड पर्यंत पोहोचल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या संदर्भात महाड औद्योगिक परिसरामध्ये पोलिसांकडून तातडीने तपासणी सुरू करण्यात आल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रमुख जीवन माने यांनी दैनिक प्रहारशी बोलताना दिली.


दरम्यान महाड मधील कारखानदारांनी तसेच नागरिकांनी आपल्या येथे नोकरीला ठेवताना अथवा जागा भाड्याने देताना सतर्कता बाळगावी असे आवाहन देखील एमआयडीसी पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.


देशातील सद्यस्थिती लक्षात घेता रायगड जिल्ह्यात बेकायदेशीर पद्धतीने आलेल्या बांगलादेशी नागरिकांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. मागील चार दिवसात पनवेल परिसरामध्ये या संदर्भात काही नागरिकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती यापूर्वीच प्रसिद्ध झाली आहे.



या पार्श्वभूमीवर महाड परिसरातील बांगलादेशी नागरिकांच्या वास्तव्याबाबतची माहिती जाणून घेतली असता एमआयडीसी पोलीस ठाण्यात यापूर्वीच संबंधित कारखाने व परिसरातील गावांमधून असलेल्या परप्रांतीयांची सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.


मागील काही दिवसापासून महाड औद्योगिक वसाहती मधील सर्व कारखान्यांना आपल्या येथे असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची तसेच परिसरातील ग्रामपंचायतींना गावात राहणाऱ्या परप्रांतीयांसंदर्भात सविस्तर माहिती देण्याबाबतची सूचना करण्यात आल्याचे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रमुख जीवनमाने यांनी स्पष्ट करून यानुसार आतापर्यंत १८ ते १९ कारखानदारांकडून आपल्या येथील कामगारांची सविस्तर माहिती देण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.


महाड औद्योगिक वसाहत मागील चार दशकांपासून सुरू असून या ठिकाणी दहा ते पंधरा हजार परप्रांतीय कामगार नोकरी व्यवसाय या निमित्ताने कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळेच प्रामुख्याने सिव्हिल, वेल्डिंग तसेच भंगार विक्रेते व सफाई कामगार म्हणून या बांगलादेशी नागरिकांनी सध्या विविध ठिकाणी आपली कामे सुरू केली असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याबाबत सविस्तर तपास सुरू असून येत्या काही दिवसातच याबाबतची अंतिम माहिती प्राप्त होईल, असे त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.


महाड औद्योगिक वसाहत परिसरातील ग्रामीण भागात नागरिकांकडून देण्यात आणि येणाऱ्या भाड्याच्या खोल्यांबाबत कोणतेही करार केले जात नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून संबंधितांबरोबर केला जाणारा करार हा कायदेशीररित्या योग्य कागदपत्रांच्या आधारे असणे आवश्यक असल्याचे नमूद केले.


गेल्या पंधरा दिवसात एमआयडीसी मध्ये झालेल्या दोन मारहाणीच्या घटनेमध्ये कामगारांकडून प्राप्त झालेल्या आधार कार्डवर टोपण नावे असल्याचे दिसून आल्याची त्यांनी सांगितले.


यामुळेच संबंधितांचे मूळ नाव, त्यांची बँकेसंदर्भातील कागदपत्रे यांची पडताळणी करूनच संबंधितांना नोकरीवर ठेवताना अथवा जागा भाड्याने देताना कारखानदार व जमीन मालकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


परिसरात सध्या सुरू असलेल्या चौकशीमध्ये प्राधान्याने फळ विक्रेते तसेच सिव्हिल व वेल्डिंग क्षेत्रामध्ये सहाय्यक कामगार म्हणून काम करणाऱ्यांमध्ये या नागरिकांचा समावेश असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली.


महाड एमआयडीसीसह तालुक्यात देखील विविध ठिकाणी या संदर्भात तपासणी मोहीम येत्या काही दिवसांमध्ये सुरू होईल असे संकेत देऊन तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपल्या परिसरात राहणाऱ्या परप्रांतीयांसंदर्भात विशेष करून बांगलादेशी नागरिकांसंदर्भात काही माहिती प्राप्त झाल्यास ती तातडीने पोलीस अथवा स्थानिक प्रशासनाकडे सुपूर्द करावी असे सुचित केले.


रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे आढळून आलेल्या बांगलादेशी नागरिकांनंतर आता हे लोन महाड पर्यंत पोहोचल्याचे शक्यता वर्तविण्यात आल्याने महाड मधील विविध व्यवसायात असलेल्या परप्रांतीयांसंदर्भात नागरिकांमधून अधिक जागरूकता बाळगणे गरजेचे असल्याचे दिसून आले आहे.

Comments
Add Comment

आणखी एका कलाकाराच्या घराला आग! बॉलिवूड दिग्दर्शकालाही आगीच्या विळख्याचा धक्का

मुंबई: आज सकाळी मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील सोरेंटो अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली.

सयाजी शिंदेंच्या ‘सह्याद्री देवराई ’ प्रकल्पाला आग! नेमकं कारण काय?

बीड: एखाद तान्ह बाळ जन्माला आल्यापासून त्याची सर्व निगा राखायची, वाढ पाहायची, आपल्यासोबत खुलताना त्याला जवळ

पुष्कर जोगच्या घराला आग! मदतीसाठी सोशल मीडीयावर पोस्ट

मुंबई: संपूर्ण देशात ख्रिसमस सण मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. मात्र दुसरीकडे मराठी सिनेक्षेत्रातील

संजय कपूरची ३० हजार कोटींची मालमत्ता कोणाला मिळणार ? न्यायालयासमोर आलेल्या याचिकेमुळे येणार नवा ट्विस्ट ?

नवी दिल्ली : उद्योगपती संजय कपूरची ३० हजार कोटी रुपयांची मालमत्ता कोणाच्या मालकीची होणार असा प्रश्न निर्माण

रफी पुरस्कार माझ्यासाठी देवाचा प्रसाद

जेष्ठ गायिका उत्तरा केळकर मुंबई : महान गायक मोहम्मद रफी यांच्या नावाने मला मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी

'वेलकम ३'चे शूटिंग संपले , वेगवेगळ्या लूक मध्ये दिसणार अक्षय कुमार

Welcome 3 : बॉलिवूडच्या वेलकम ३ या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच संपले आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार एक महत्त्वाची