इस्त्रो २०२८ पर्यंत प्रक्षेपित करणार १० टनाचे उपग्रह

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) जगाच्या बरोबरीने झेप घेण्याची तयारी करीत आहे. इस्त्रो २०२८ पर्यंत १० टन वजनाचे उपग्रह स्वतःच्या बळावर प्रक्षेपित करणार आहे. सध्ये इस्त्रोला ४ टनांहून अधिक वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी नासाची मदत घ्यावी लागते. परंतु, येत्या ३ वर्षात हे चित्र बदलणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली.


यासंदर्भात त्यांनी सांगितले की, येत्या ५ वर्षात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे आमचे पहिले मॉड्यूल कक्षेत प्रक्षेपित केले जाईल. नासाच्या नंतर इस्रोचा जन्म होऊनही नासाने इस्रोच्या यशाची कबुली देण्यास सुरुवात केली आहे. इस्त्रोची क्षमता दिवसेंदिवस वाढत आहे. इस्रोने आतापर्यंत ४३२ हून अधिक उपग्रह प्रक्षेपित केले आहेत, त्यापैकी 397 गेल्या १० वर्षांत प्रक्षेपित केले आहेत. इस्रोने सन २०२५ साठी आपले लक्ष्यही निश्चित केले आहे. त्यानुसार २०२५ मध्ये, नाविक ०२, युएस सॅटेलाईट फॉर मोबाईल आणि बायोमिना हे प्रमुख उपग्रह इस्त्रो जानेवारील प्रक्षेपित करणार आहे. इस्रो, नासाच्या सहकार्याने, फेब्रुवारी-मार्चमध्ये मोबाईल फोनची सुविधा देण्यासाठी एक उपग्रह पाठवणार आहे. सध्या वापरले जात असलेले सेल्युलर नेटवर्क जगाच्या सुमारे १५ टक्के भाग आहे. त्यामुळे ऑफ-द-ग्रिड ठिकाणी प्रवास करताना, मोबाइल नेटवर्क उपलब्ध नसते. पण जेव्हा ते थेट उपग्रहाद्वारे जोडले जाईल तेव्हा या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.


अंतराळ क्षेत्रात झेप घेण्यासाठी भारताने जानेवारी महिन्यात ‘नाविक-०२’ प्रक्षेपित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ही भारताची स्वदेशी उपग्रह नेव्हिगेशन प्रणाली आहे. ही स्वदेशी नेव्हिगेशन प्रणाली भारताला अमेरिका, युरोप, रशिया आणि चीन यांच्या बरोबरीत आणेल. यासह, भारत आपल्या सध्याच्या प्रादेशिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणालीच्या पुढे जाईल. तसेच जगाच्या नेव्हिगेशन क्षेत्रात वर्चस्व मिळवू शकेल. तसेच भारत २०२६ पर्यंत मानवी उपग्रह पाठवू शकणार आहे. या दिशेने पावले उचलत इस्रोने पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बायोमिना टीव्ही डी-२ पाठवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हा एक मानवरहित उपग्रह असेल. जे अंतराळात जाईल आणि सुरक्षितपणे परत येईल. त्यात मानवी गुण असलेला रोबोट पाठवण्यात येणार आहे. तो सुरक्षित परत आल्यानंतर अभ्यास केला जाईल आणि पुढील प्रक्रियेत मानवी उपग्रह पाठवण्याची तयारी केली जाईल.


भारताच्या अंतराळ क्षेत्राचा जागतिक अवकाश अर्थव्यवस्थेत सध्या ८ ते ९ टक्के वाटा आहे. येत्या दहा वर्षांत ते तीनपट वाढण्याची अपेक्षा आहे. सध्याच्या भारतीय अंतराळ अर्थव्यवस्थेचे मूल्य अंदाजे ८.४ अब्ज डॉलर आहे. आगामी २०३३ पर्यंत भारताची अंतराळ अर्थव्यवस्था ४४ अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. युरोपियन उपग्रह प्रक्षेपणातून देशाला २९२ दशलक्ष युरो मिळाले. अशाप्रकारे, लवकरच भारतीय अर्थव्यवस्थेत अवकाश क्षेत्राचे योगदान सर्वात महत्त्वाचे ठरणार असल्याचे जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक

Dubare Elephant Camp : थरकाप उडवणारी घटना! कर्नाटकातील दुबारे हत्ती कॅम्पमध्ये दोन हत्तींच्या झुंजीत महिला पर्यटकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू

कर्नाटकातील कोडागू जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या 'दुबारे एलिफंट कॅम्प' (Dubare Elephant Camp) मध्ये एक अत्यंत

Yogi Adityanath : ‘नमाज पठण करायचे असेल तर शिफ्टमध्ये करा, प्रेमाने ऐकाल तर ठीक, नाहीतर...’; योगी आदित्यनाथ यांचा थेट इशारा

उत्तर प्रदेश : आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh Minister) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)

India - Sweden Bilateral Talks : पंतप्रधान मोदींची स्वीडनच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी स्वीडनमधील गॉथेनबर्ग येथे पंतप्रधान महामहीम उल्फ क्रिस्टरसन

Uttar Pradesh Road Accident : उत्तर प्रदेशामध्ये ट्रक-मॅजिकच्या धडकेत १० जणांचा मृत्यू

लखनौ : येथील लखीमपूर खेरी येथे सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण रस्ते अपघातात १० जणांचा

Jammu Kashmir Drug Case : पंजाबनंतर आता जम्मू-काश्मीर ड्रग्जचे नवे हॉटस्पॉट! १३ लाखांहून अधिक युवक ड्रग्जच्या आहारी

जम्मू काश्मीर : पंजाबनंतर आता जम्मू-काश्मीर अंमली पदार्थांच्या विळख्यात (Jammu Kashmir Drug Case) अडकत असल्याचे धक्कादायक