वर्षातील शेवटच्या सोमवती अमावस्येला काय करावे आणि काय करू नये ?

मुंबई : हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला महत्त्व आहे. सोमवती अमावस्या म्हणजे सोमवारी येणारी अमावस्या. यंदाच्या वर्षातली शेवटची सोमवती अमावस्या ही सोमवार ३० डिसेंबर २०२४ रोजी आहे. सोमवती अमावस्येला शंकराची पूजा करतात. अनेक ठिकाणी शिवलिंगाचे पूजन केले जाते. शिवलिंगाची मनापासून पूजा केल्यास घरात शांतता आणि सुखसमृद्धी लाभते. या दिवशी तर्पण, श्राद्ध आणि पिंड दान केल्याने पितरांचा आशीर्वाद लाभतो. मनातील सदिच्छा पूर्ण होतात असेही सांगतात.



वर्षातल्या शेवटच्या सोमवती अमावस्येची सुरुवात सोमवारी ३० डिसेंबर रोजी पहाटे चार वाजून एक मिनिटांनी झाली. ही सोमवती अमावस्या मंगळवार ३१ डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजून ५६ मिनिटांनी संपेल.



सोमवती अमावस्येला काय करावे ?

सोमवती अमावस्येला तर्पण, श्राद्ध आणि पिंड दान केल्याने पितरांचा आशीर्वाद लाभतो. सोमवती अमावस्येला पवित्र नदीत अथवा पवित्र तलावात अथवा पवित्र कुंडात स्नान करावे. यामुळे पापक्षालने होते आणि पुण्यसंचय होतो. गरजूंना यथाशक्ती दान करावे. भगवान शंकराची आराधना करावी. घर आणि भोवतालचा परिसर स्वच्छ करावा. स्वच्छता राखावी. सोमवती अमावस्येला आजारी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांची सेवा करावी.



सोमवती अमावस्येला काय करू नये ?

सोमवती अमावस्येला वाद घालणे, खोटे बोलणे टाळावे. सोमवती अमावस्येला मांसाहार आणि मद्यपान करणे टाळावे. अहंकार आणि दुराभिमान टाळावा. कायद्याचे उल्लंघन करणे टाळावे.
Comments
Add Comment

नाव न सांगता साईबाबा चरणी "इतक्या" कोटींचा सोन्याचा हार अर्पण...

शिर्डी : साईबाबांचा १०७ वा पुण्यतिथी उत्सव १ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर या दरम्यान झाला. अनेक भाविकांनी दर्शनासाठी

यंदा कधी आहे कोजागिरी पौर्णिमा ? जाणून घ्या या तिथीचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त

कोजागिरी पौर्णिमा हा आश्विन पौर्णिमेला येणार भारतीय हिंदू संस्कृतीमधील महत्वाचा दिवस आहे. आणि इंग्रजी

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे चिपळूणमध्ये पुराचा धोका

चिपळूण (वार्ताहर) : चिपळूण शहराला असलेल्या पुराच्या धोक्याबाबत उपाययोजना सूचविण्यासाठी राज्य सरकारने जलसंपदा

मंत्री नितेश राणेंचा वैभववाडीत उबाठावर मोठा घाव!

मंगेश लोकेंसह शेकडो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेश ओरोस (वार्ताहर) : वैभववाडी तालुक्यात उद्धव

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

रायगड जिल्हा परिषदेत २ हजार ६०९ पदे रिक्त

अलिबाग (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विकासाला गती देण्याचे काम रायगड जिल्हा परिषदेचे असले, तरी जिल्हा परिषदेत