वर्षातील शेवटच्या सोमवती अमावस्येला काय करावे आणि काय करू नये ?

  98

मुंबई : हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला महत्त्व आहे. सोमवती अमावस्या म्हणजे सोमवारी येणारी अमावस्या. यंदाच्या वर्षातली शेवटची सोमवती अमावस्या ही सोमवार ३० डिसेंबर २०२४ रोजी आहे. सोमवती अमावस्येला शंकराची पूजा करतात. अनेक ठिकाणी शिवलिंगाचे पूजन केले जाते. शिवलिंगाची मनापासून पूजा केल्यास घरात शांतता आणि सुखसमृद्धी लाभते. या दिवशी तर्पण, श्राद्ध आणि पिंड दान केल्याने पितरांचा आशीर्वाद लाभतो. मनातील सदिच्छा पूर्ण होतात असेही सांगतात.



वर्षातल्या शेवटच्या सोमवती अमावस्येची सुरुवात सोमवारी ३० डिसेंबर रोजी पहाटे चार वाजून एक मिनिटांनी झाली. ही सोमवती अमावस्या मंगळवार ३१ डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजून ५६ मिनिटांनी संपेल.



सोमवती अमावस्येला काय करावे ?

सोमवती अमावस्येला तर्पण, श्राद्ध आणि पिंड दान केल्याने पितरांचा आशीर्वाद लाभतो. सोमवती अमावस्येला पवित्र नदीत अथवा पवित्र तलावात अथवा पवित्र कुंडात स्नान करावे. यामुळे पापक्षालने होते आणि पुण्यसंचय होतो. गरजूंना यथाशक्ती दान करावे. भगवान शंकराची आराधना करावी. घर आणि भोवतालचा परिसर स्वच्छ करावा. स्वच्छता राखावी. सोमवती अमावस्येला आजारी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांची सेवा करावी.



सोमवती अमावस्येला काय करू नये ?

सोमवती अमावस्येला वाद घालणे, खोटे बोलणे टाळावे. सोमवती अमावस्येला मांसाहार आणि मद्यपान करणे टाळावे. अहंकार आणि दुराभिमान टाळावा. कायद्याचे उल्लंघन करणे टाळावे.
Comments
Add Comment

मध्य -हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेवर येत्या रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा

अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे पालक संतप्त; विद्यार्थी तणावाखाली

मुंबई : शिक्षण संचालनालयाने अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवसापासून घातलेल्या गोधळानंतर पहिली यादीही

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

Tata Hospital : भारतात टाटा रुग्णालयामध्ये प्रथमच एमआयबीजी पद्धतीचा वापर, न्यूरोब्लास्टोमा रुग्णाचा जीव वाचला...

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून न्यूरोब्लास्टोमा (Neuroblastoma) कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होतं आहे. यापूर्वी अनेक