Harnai : हर्णै बंदरात मासळी खरेदीसाठी खवय्यांची गर्दी

  86

सकाळच्या वेळी बंदराला जत्रेचे स्वरूप


दापोली : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ‘थर्टी फर्स्ट’च्या दोन दिवस आधीच सुट्टीसाठी आलेल्या पर्यटकांची सकाळच्या सुमारास रोजच हर्णै (Harnai) बंदरात मासळी खरेदीला गर्दी होत आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी बंदराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. पर्यटक आवर्जून ताजी मासळी व सुकी मासळी खाण्यासाठी व खरेदीसाठी हजेरी लावू लागले आहेत. यावेळेस मासळीची आवक खूपच कमी असल्याने बंदरामध्ये येणारी मासळी खरेदीसाठी गर्दी दिसत आहे.


मिनी महाबळेश्वर म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या दापोलीचे थंड आल्हाददायक वातावरण, दापोली शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेला केळशी ते दाभोळपर्यंतचा स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा आणि नारळी-पोफळीच्या बागांची निवांत सावली यामुळे पर्यटकांकडून दापोलीतील समुद्रकिनाऱ्याला मोठीच पसंती मिळत आहे. दापोलीत दाभोळ, बुरोंडी, आडे, केळशी बंदरात मासेमारी होत असली तरी मुख्यत्वे हर्णै हे तालुक्याचे ताजी मासळी मिळण्याचे मुख्य ठिकाण आहे. या ठिकाणी सकाळ संध्याकाळ असे दिवसातून दोनदा मासळीचा लिलाव होत असतो. महाराष्ट्रभरातून पर्यटक मासळी खरेदीसाठी हर्णै बंदरात आवर्जून येतात.



दापोलीतील बंदरात ऑगस्ट महिन्यापासून मासेमारीला सुरुवात झाली, मात्र सुरुवातीपासूनच वारंवार वादळांच्या तडाख्यांमुळे गेले दोन महिने मासळीची आवकच झाली नाही. सप्टेंबर शेवटच्या आठवड्यापासून नौका मासेमारीकरिता समुद्रामध्ये जायला लागल्या. त्यात येणाऱ्या मासळीमध्ये जेलीफिशचे प्रमाण जास्त होते तर खाण्यासाठी लागणाऱ्या मच्छीचे प्रमाण खूपच कमी होते. मात्र फिशिंगसाठी दररोज जाणाऱ्या छोट्या होड्या किरकोळ मासळी आणत. त्यामुळे मत्स्यहारी खवय्यांची मासळीची भूक भागत होती.



मत्स्याहारावर मारला ताव


दापोलीत पर्यटनासाठी येणारे हे पर्यटक खास फिरणे आणि मासळी खाणे आणि खरेदीसाठी येत असतात. येथे पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला मासळी खाण्याचा एक वेगळाच विलक्षण आनंद असतो. दापोली तालुक्यात कोणत्याही ठिकाणी वास्तव्याला आलेला पर्यटक हर्णै बंदरामधील ताजी मासळी खाण्यासाठी येतच असतात. त्याप्रमाणे आता तालुक्यातील बहुतांशी हॉटेल व रिसॉर्टमध्ये झिंगा फ्राय, पापलेट थाळी, सुरमई थाळी, कोळंबी बिर्याणी आदी मासळीच्या चटकदार मसालेदार डिशेस खाण्यासाठी पर्यटक येथे येत आहेत. पापलेट, सुरमई, कोलंबी, बांगडा आदी प्रकारच्या मासळीला पर्यटकांची मागणी जास्त आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण