Sunil Gavaskar : सुनील गावस्करांना पाहता नितीश कुमारचे वडील झाले भावूक

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉक्सिंग डे कसोटी खेळली जात आहे. मेलबर्नमध्ये सामन्यात आठव्या विकेटसाठी नितीश कुमार रेड्डीने साजेशी कामगिरी केली. तसेच शतक झळकावून टीम इंडियाला संकटातून बाहेर काढलं. मुलाची शतकी खेळी पाहून वडील मुत्याला रेड्डी हे देखील भावुक झाले.त्यांनी महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्या पायाला स्पर्श केला. गावस्कर यांनी भावूकपणे नितीशच्या वडिलांना मिठी मारली. रेड्डी कुटुंबीय गावस्कर यांच्या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शनिवारी मेलबर्नमधील चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी नितीशने शानदार शतक झळकावून चर्चेत आणले त्याने भारताला कठीण परिस्थितीतून सोडवले. मेलबर्न कसोटी सामना पाहण्यासाठी रेड्डी कुटुंब ऑस्ट्रेलियात आले होते. नितीशने त्याला निराश केले नाही आणि या दौऱ्यातील आपली सर्वोत्तम खेळी खेळत ११४ धावा केल्या.नितीश कुमार रेड्डीच्या शतकानंतर त्यांच्या कुटुंबाला सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री यांसारख्या दिग्गजांची भेट दिली. यावेळी त्यांना पाहताच नितीशच्या वडिलांनी त्यांचे पाय धरले. यावेळी नितीशचं क्रिकेट करिअर पुढे नेण्यासाठी केलेल्या मदतीसाठी नितीशच्या वडिलांनी आभार मानले. यावेळी गावस्कर यांच्या डोळ्यातही पाणी आलं. त्यांनी सांगितलं की, मुत्याला यांच्या त्यागामुळेच भारताला नितीश कुमार रेड्डीसारखा हिरा मिळाला आहे. सुनील गावस्कर यांनी सांगितलं की, 'आम्हाला माहिती आहे त्यांनी किती त्याग केला आहे. त्यांनी खूप संघर्ष केला आहे. तुमच्यामुळे मला अश्रू अनावर झाले. तुमच्यामुळे भारताला एक हिरा मिळाला.'




नितीशच्या आईने सुनील गावस्कर यांना सांगितलं की, मला विश्वास बसत नाही की माझा मुलगा इतक्या मोठ्या मैदानात खेळत आहे. तसेच इतकी मोठी खेळी केली. दुसरीकडे, नितीशची खेळी पाहून रवि शास्त्रीही भावुक झाले होते. त्यांनी सांगितलं की ही खेळी पाहून डोळ्यात अश्रू आले. एमसीजीच्या बॅकरूमध्ये हे भावुक क्षण कॅमेऱ्यात कैद झाले. आठव्या विकेटसाठी नितीशने १८९ चेंडूत ११ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ११४ धावा केल्या आणि बाद झाला. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात कमबॅक केलं आहे. त्यामुळे हा सामना ड्रॉ करण्याशिवाय टीम इंडियाकडे पर्याय नाही.

Comments
Add Comment

अखेर पाकच्या सरकारी विमान कंपनीचा लिलाव! कोणी घेतली एअरलाईन अन् भारताचा संबंध काय?

कराची: अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइंस (PIA) च्या

जपानमधील कारखान्यात 'चाकू हल्ला' आणि 'विषारी द्रव' फवारले; १४ जण जखमी

मिशिमा: टोकियोच्या पश्चिमेला असलेल्या शिझुओका प्रीफेक्चरमधील मिशिमा शहरातील रबर कारखान्यात एका व्यक्तीने

कॅनडातील भारतीयांची स्थिती नाजूक! २० वर्षीय विद्यार्थ्याची कॉलेज कॅम्पसमध्ये गोळ्या झाडून हत्या

टोरंटो: बांगलादेशात दिपू चंद्र दास या हिंदू तरुणाची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच कॅनडातूनही एक धक्कादायक

उपचारासाठी रुग्णालयात तब्बल आठ तास प्रतीक्षा! अखेर भारतीय तरुणाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

एडमोंटन: उपचारासाठी तब्बल आठ तास प्रतीक्षा पाहिल्यानंतर अखेर मृत्यूला जवळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मूर्ती पाडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर सुरक्षेचे कारण; भगवान विष्णूंच्या 'त्या' मूर्तीबाबत स्पष्टीकरण

बॅंकॉक: थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावादावरून थाई लष्कराने भगवान विष्णूंची एक मूर्ती पाडल्याची घटना

तारिक रहमान १७ वर्षांनी मायदेशी परतले; बांगलादेशातील राजकीय चर्चांना उधाण

ढाका: बांगलादेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळात