Navi Mumbai Airport : इंडिगोचे प्रवासी विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले!

'या' तारखेपासून सुरु होणार व्यावसायिक विमानसेवा


नवी मुंबई : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Navi Mumbai Airport) काम जवळपास पूर्ण झाले असून लवकरच हे विमानतळ प्रवाशांसाठी सज्ज होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या विमानतळावर वायुदळाचे सी २९५ आणि सुखोई ३० या विमानांच्या यशस्वी लँडिंगनंतर आज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या व्यावसायिक विमानाचे लँडिग झाले आहे. त्यामुळे लवकरच ही सेवा सुरु होणार असून नवी मुंबई विमानतळ प्रवाशांना नववर्षाची भेट मिळाली आहे.


महिन्याभरापूर्वी नवी मुंबई विमानतळावर करण्यात आलेली लँडिंग टेस्ट यशस्वी झाल्यानंतर आज इंडिगोचे प्रवासी विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. आज दुपारच्या सुमारास व्यावसायिक विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर लँडिंग केले असून यावेळी सिडको आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.



कधीपासून होणार सुरु?


येत्या नववर्षात मार्च महिन्यार्पंत विमानतळाबाबत सर्व परवानग्या मिळणार असून १७ एप्रिल २०२५ मध्ये पहिले प्रवासी आणि कार्गो विमान सुरू होणार आहे. ही विमानसेवा देशाची सर्वात मोठी कार्गो प्रणाली असल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार वाढेल आणि स्थानिक व्यवसायांना चांगलाच फायदा होणार आहे.


दरम्यान, १७ एप्रिल रोजी देशांतर्गंत विमानसेवेचे उद्घाटन होणार आहे. तर, आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे उद्घाटन जून महिन्यापर्यंत होईल, असे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सीईओ बी.व्ही.जेके शर्मा यांनी सांगितले आहे.



काय आहेत वैशिष्टये?


नवी मुंबई विमानसेवा कार्यान्वित झाल्यानंतर दरवर्षी ९० दशलक्ष प्रवासी हाताळेल अशी अपेक्षा आहे. सध्या ३.७ किमी धावपट्टी ऑपरेशनसाठी तयार आहे, लवकरच दुसरी धावपट्टी बांधण्याची योजना आहे. त्याचबरोबर भूमिगत मेट्रो द्रुतगती मार्ग, अटल सेतू पूल, बुलेट ट्रेन सेवा या बहुविध वाहतूक पर्यायांमुळे विमानतळ प्रवेशयोग्य होईल आणि प्रवाशांचा प्रवास वेळ देखील कमी होणार आहे.


Comments
Add Comment

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’ मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे

स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडे उमेदवारांचा दुष्काळ

काँग्रेसकडे मुंबईतील ३० प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही उत्तर मुंबईत उमेदवार शोधण्यासाठी करावी लागणार

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या