Navi Mumbai Airport : इंडिगोचे प्रवासी विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले!

'या' तारखेपासून सुरु होणार व्यावसायिक विमानसेवा


नवी मुंबई : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Navi Mumbai Airport) काम जवळपास पूर्ण झाले असून लवकरच हे विमानतळ प्रवाशांसाठी सज्ज होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या विमानतळावर वायुदळाचे सी २९५ आणि सुखोई ३० या विमानांच्या यशस्वी लँडिंगनंतर आज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या व्यावसायिक विमानाचे लँडिग झाले आहे. त्यामुळे लवकरच ही सेवा सुरु होणार असून नवी मुंबई विमानतळ प्रवाशांना नववर्षाची भेट मिळाली आहे.


महिन्याभरापूर्वी नवी मुंबई विमानतळावर करण्यात आलेली लँडिंग टेस्ट यशस्वी झाल्यानंतर आज इंडिगोचे प्रवासी विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. आज दुपारच्या सुमारास व्यावसायिक विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर लँडिंग केले असून यावेळी सिडको आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.



कधीपासून होणार सुरु?


येत्या नववर्षात मार्च महिन्यार्पंत विमानतळाबाबत सर्व परवानग्या मिळणार असून १७ एप्रिल २०२५ मध्ये पहिले प्रवासी आणि कार्गो विमान सुरू होणार आहे. ही विमानसेवा देशाची सर्वात मोठी कार्गो प्रणाली असल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार वाढेल आणि स्थानिक व्यवसायांना चांगलाच फायदा होणार आहे.


दरम्यान, १७ एप्रिल रोजी देशांतर्गंत विमानसेवेचे उद्घाटन होणार आहे. तर, आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे उद्घाटन जून महिन्यापर्यंत होईल, असे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सीईओ बी.व्ही.जेके शर्मा यांनी सांगितले आहे.



काय आहेत वैशिष्टये?


नवी मुंबई विमानसेवा कार्यान्वित झाल्यानंतर दरवर्षी ९० दशलक्ष प्रवासी हाताळेल अशी अपेक्षा आहे. सध्या ३.७ किमी धावपट्टी ऑपरेशनसाठी तयार आहे, लवकरच दुसरी धावपट्टी बांधण्याची योजना आहे. त्याचबरोबर भूमिगत मेट्रो द्रुतगती मार्ग, अटल सेतू पूल, बुलेट ट्रेन सेवा या बहुविध वाहतूक पर्यायांमुळे विमानतळ प्रवेशयोग्य होईल आणि प्रवाशांचा प्रवास वेळ देखील कमी होणार आहे.


Comments
Add Comment

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना

डॉ. अभिजित चौधरी 'पीएमआरडीए'चे नवे आयुक्त

मुंबई : राज्य शासनाने बुधवारी दोघा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, पुणे महानगर प्रदेश विकास

पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई, दि. ४ : - पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित