Papaya And Cotton Price Fall : कापसाचे दर गडगडले, पपईलाही मिळतोय कवडीमोल भाव; उत्पादक शेतकरी अडचणीत!

  48

नांदेड : राज्यभरात तापमानाचा पारा घसरला असून थंडीने चांगलाच जोर धरला आहे. मात्र काही ठिकाणी ऐन हिवाळ्यात पावसाची रिपरिप सुरुच असल्याचे दिसून येत आहे. या बदलत्या वातावरणाचा (Weather Update) फटका शेतकऱ्यांना बसत आहे. एकीकडे महागाई वाढत असताना दुसरीकडे कापूस, सोयाबीनसह फळांच्या किमती घसरत चालल्या आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.



कापसाच्या दरात पुन्हा घसरण


काही दिवसांपूर्वी कापसाच्या दरात एक हजार रुपयांची घसरण झाली (Cotton Price Fall) होती. अशातच आता पुन्हा कापसाच्या किंमतीत ६०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली असल्याचे दिसून येत आहे.



पपईला मिळतोय कवडीमोल भाव


बदलत्या वातावरणाचा फटका पपईवरही पडत (Papaya Price Fall) आहे. नांदेडमधील एका शेतकऱ्याने दीड लाख रुपये खर्च करुन पपईची लागवड केली होती. परंतु वातावरणातील बदलाचा फटका या पपईला बसत असून बाजारात पपईला कवडीमोल भाव मिळत आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या