Ajit Pawar : वाहतुकीची समस्या, रस्त्यांच्या कामावर लक्ष केंद्रीत करा - अजित पवार

  50

पुणे : पुणे शहरातील वाहतूककाेंडीचा विषय गंभीर झाला आहे. त्यासाठी पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए, मेट्राे, पीएमपी आणि वाहतूक पोलिस या सर्व घटकांना समाविष्ट करून ‘माेबिलिटी प्लॅन’ तयार केला जाणार आहे. शहरातील वाहतुकीची समस्या, रस्त्यांच्या कामावर लक्ष केंद्रीत करावे. पालिकेच्या आगामी अंदाजपत्रकात रस्त्यांच्या कामासाठी अधिक तरतूद करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

शहरातील वाहतूककाेंडीसह विविध प्रश्नांसंदर्भात पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला पालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भाेसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., नगर अभियंता प्रशांत वाघमारे आदी उपस्थित हाेते. शहरातील वाहतूककाेंडीचा विषय गंभीर झाला आहे. त्यामुळे शहरातील वाहतूककाेंडी साेडविण्यासाठी पुढील महिन्यात बैठक आयोजित केली जाणार आहे. यात पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए, मेट्राे, पीएमपी, वाहतुक पोलिस आदी सर्व घटकांना समाविष्ट करून माेबिलिटी प्लॅन तयार केला जाणार आहे.



पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट केलेल्या गावांतील मिळकत कर वसुली थकली आहे. मिळकत कर आकारणीवरून ग्रामस्थांकडून तक्रारी झाल्या हाेत्या. त्यानंतर राज्य सरकारने या गावांतील मिळकत कर वसुलीला स्थगिती दिली आहे. याचा परिणाम महापालिकेच्या मिळकत कराच्या उत्पन्नावर हाेत आहे. त्याच वेळी समाविष्ट गावांतही नागरी सुविधा पुरावायच्या आहेत. याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधले. त्यावर यासंदर्भात जानेवारी महिन्यात मंत्रालयात बैठक घेण्यात येईल. त्यातून मार्ग काढला जाईल, असे पवार यांनी सांगितले.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या