
ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा- मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा केला जातो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरूत्व वाहिनीवर कटाई नाका ते मुकुंद पर्यंतच्या जलवाहिनीवर देखभाल दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. परिणामी, गुरूवार दिनांक २६/१२/२०२४ रात्री १२.००ते शुक्रवार दिनांक २७/१२/२०२४ रात्री १२.०० वाजेपर्यत एकूण २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

मुंबई: देशासह जगभरात आज २५ डिसेंबरला ख्रिसमसचा(Christmas 2024) सण साजरा केला जातआहे. चर्चेमध्ये मध्यरात्री विशेष प्रार्थना करण्यात आले. भारतातही गोवा, ...
या शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेतंर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र.२६ व ३१ चा काही भाग वगळता ) आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागामध्ये व वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी.
दरम्यान कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.