राज्यातील मंदिरांमध्ये आठवड्यातून एकदा महाआरती; शिर्डी येथील राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषदेत ठराव

Share

शिर्डी : राज्यातील मंदिरांमध्ये आठवड्यातून एकदा महाआरती करण्याचा ऐतिहासिक ठराव साईंच्या शिर्डीत करण्यात आला. शिर्डी येथे आयोजित राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषदेत हा ठराव करण्यात आला आहे.

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने दोन दिवसीय अधिवेशन शिर्डीत घेण्यात आले. या अधिवेशनासाठी राज्यभरातील साडे सातशे मंदीराचे एक हजाराहून अधिक विश्वस्त सहभागी झाले होते. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील सर्व मंदिरांमध्ये आठवड्यातून एकदा सामूहिक महाआरती करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या निर्णयाला उपस्थित असलेल्या सर्व विश्वस्तांनी अनुमोदन देत हा ठराव पास केला.हिंदू धर्माला एकत्रित आणण्यासाठी हा ठराव करण्यात आला असून याबरोबरच अनेक ठराव देखील या अधिवेशनात पारित करण्यात आल्याचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी सांगितले.

अनेक मंदिरांवर सरकारी नियंत्रण असून हे नियंत्रण हटविण्याची मागणी या अधिवेशनात करण्यात आली तर वक्फ बोर्डाने काबीज केलेल्या मंदिरांच्या जागा देखील सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा ठराव या अधिवेशनात पारित करण्यात आल्याचे नाशिक येथील काळाराम मंदिराचे महंत सुधिरदास यांनी सांगितले. दोन दिवस सुरू असलेल्या अधिवेशनात राज्यभरातील एक हजाराहून अधिक विश्वस्त सहभागी झाले होते. मंदिरांचे होणारे सरकारीकरण रोखावे, वक्फ बोर्डाने हस्तांतरित केलेल्या जागांचा निर्णय घ्यावा. यासह मंदिरांच्या जागा बळकवण्याचा होत असलेला प्रयत्न टाळण्यासाठी राज्य सरकारने नविन कायदा करावा असे विविध ठराव यावेळी करण्यात आले. या सगळ्या गोष्टींसाठी हिंदूंनी एकत्र येण्यासाठी आठवड्यातून एकदा सामूहिक आरती करण्याचा ऐतिहासिक ठराव या अधिवेशनात मंजूर करण्यात आला.

Recent Posts

Viral News: ‘हे’ गाणे ऐकून लोक आत्महत्या करायचे; ६२ वर्षांनंतर बंदी हटवली!

मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…

1 hour ago

Mumbai Airport Close : प्रवासी कृपया लक्ष द्या, मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद राहणार आहे!

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…

1 hour ago

MI vs CSK, IPL 2025: मुंबई इंडियन्स मागील पराभवाचा वचपा काढणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…

2 hours ago

लिंबू लोणचं

पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…

2 hours ago

पुण्यात काँग्रेसला गळती, नेते आणि पदाधिकारी महायुतीच्या वाटेवर

पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…

2 hours ago

भाषा हे राजकारण्यांच्या हातातले हत्यार नाही!

डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…

2 hours ago