राज्यातील मंदिरांमध्ये आठवड्यातून एकदा महाआरती; शिर्डी येथील राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषदेत ठराव

  155

शिर्डी : राज्यातील मंदिरांमध्ये आठवड्यातून एकदा महाआरती करण्याचा ऐतिहासिक ठराव साईंच्या शिर्डीत करण्यात आला. शिर्डी येथे आयोजित राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषदेत हा ठराव करण्यात आला आहे.


महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने दोन दिवसीय अधिवेशन शिर्डीत घेण्यात आले. या अधिवेशनासाठी राज्यभरातील साडे सातशे मंदीराचे एक हजाराहून अधिक विश्वस्त सहभागी झाले होते. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील सर्व मंदिरांमध्ये आठवड्यातून एकदा सामूहिक महाआरती करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या निर्णयाला उपस्थित असलेल्या सर्व विश्वस्तांनी अनुमोदन देत हा ठराव पास केला.हिंदू धर्माला एकत्रित आणण्यासाठी हा ठराव करण्यात आला असून याबरोबरच अनेक ठराव देखील या अधिवेशनात पारित करण्यात आल्याचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी सांगितले.



अनेक मंदिरांवर सरकारी नियंत्रण असून हे नियंत्रण हटविण्याची मागणी या अधिवेशनात करण्यात आली तर वक्फ बोर्डाने काबीज केलेल्या मंदिरांच्या जागा देखील सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा ठराव या अधिवेशनात पारित करण्यात आल्याचे नाशिक येथील काळाराम मंदिराचे महंत सुधिरदास यांनी सांगितले. दोन दिवस सुरू असलेल्या अधिवेशनात राज्यभरातील एक हजाराहून अधिक विश्वस्त सहभागी झाले होते. मंदिरांचे होणारे सरकारीकरण रोखावे, वक्फ बोर्डाने हस्तांतरित केलेल्या जागांचा निर्णय घ्यावा. यासह मंदिरांच्या जागा बळकवण्याचा होत असलेला प्रयत्न टाळण्यासाठी राज्य सरकारने नविन कायदा करावा असे विविध ठराव यावेळी करण्यात आले. या सगळ्या गोष्टींसाठी हिंदूंनी एकत्र येण्यासाठी आठवड्यातून एकदा सामूहिक आरती करण्याचा ऐतिहासिक ठराव या अधिवेशनात मंजूर करण्यात आला.

Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी