Saturday, March 15, 2025
Homeक्रीडा१४७ वर्षात पहिल्यांदा...मेलबर्न कसोटीत भारत रचणार इतिहास?

१४७ वर्षात पहिल्यांदा…मेलबर्न कसोटीत भारत रचणार इतिहास?

मुंबई: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ सध्या रोमहर्षक वळणावर आली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. ही कसोटी मालिका सध्या १-१ अशा बरोबरीत आहे. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना २६ डिसेंबर ते ३० डिसेंबरदरम्यान खेळवला जाणार आहे. मेलबर्नच्या क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना असणार आहे. हा कसोटी सामना जिंकत भारत आपल्या नावावर एक खास रेकॉर्ड करू शकतो. हा रेकॉर्ड करताना टीम इंडिया १९८५मध्ये चुकली होती.

काय आहे तो खास रेकॉर्ड

मेलबर्नमध्ये भारताचा रेकॉर्ड आतापर्यंत मिळताजुळता राहिला आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत १४ कसोटी सामने खेळवण्यात आले. यातील ऑस्ट्रेलियाने ८ सामने जिंकले तर भारताने चार सामने जिंकलेत. दोन कसोटी सामने अनिर्णीत राहिले. मात्र टीम इंडिया या मैदानावर आतापर्यंत विजयाची हॅटट्रिक लावू शकलेली नाह. दरम्यानच्या, हल्लीच्या वर्षांमध्ये भारतीय संघाचे भारतीय संघाची कामगिरी मेलबर्नमध्ये मजबूत राहिली आहे यामुळे चाहते आणि संघाचा आत्मविश्वास वाढला आहे.

भारत मेलबर्न कसोटीत २०१८ला १३७ धावांनी जिंकण्यात यशस्वी ठरला होता. यानंतर भारताने मेलबर्न कसोटी २०२०मध्ये ऑस्ट्रेलियाला ८ विकेटनी हरवले. मेलबर्नमध्ये भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. आता टीम इंडिया मेलबर्न २०२४ कसोटी जिंकत मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर विजयी हॅटट्रिकचा रेकॉर्ड बनवू शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -