Narayan Rane On Nanar Refinery : नाणार प्रकल्प होणार? नारायण राणेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

रत्नागिरी : रत्नागिरी इथे नारायण राणे (Narayan Rane) यांची सोमवारी पत्रकार परिषद झाली त्यावेळी त्यांनी कोकणातील रिफायनरी प्रकल्पाबाबत वक्तव्य केलं आहे. कंपन्या तयार असतील तर नाणार प्रकल्प होणार, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिली आहे. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये कोकणातल्या रिफायनरीच्या (Narayan Rane On Nanar Refinery) मुद्द्यावरून परस्पर विरोधी मते असल्याचे दिसून येते.



कोकणातील रिफायनरी प्रकल्प राज्याबाहेर गेला अशी चर्चा सुरू असताना नारायण राणे (Narayan Rane) यांचे हे विधान खूप महत्त्वाचे आहे. शिवाय नारायण राणे यांनी बारसु रिफायनरी (Barsu Refinery Project) ऐवजी नाणारचा उल्लेख केल्यामुळे याला आणखी महत्व प्राप्त झालं आहे. कारण राज्यातील सरकार आल्यानंतर कोकणातले भाजपा नेते हे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे. नाणार रिफायनरी समर्थक देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे नारायण राणे यांचं विधान अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे.




नाणार येथील रिफायनरीसाठीचे जमीन अधिग्रहण २०१९ मध्ये रद्द केले गेले. त्यानंतर बारसूचा विषय चर्चेत आला. पण, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी आणि निवडणुकीच्या निकालानंतर देखील बार्शी येथे रिफायनरी होणार नाही, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने घेतली आहे. तर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला असलेला विरोध मोडून काढण्यामध्ये नारायण राणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे नारायण राणे यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे? भाजपा नाणार रिफायनरीसाठी प्रयत्नशील तर नाही ना? असे प्रश्न यातून उपस्थित होतात.




नाणार रिफायनरी समर्थक घेणार देवेंद्र फडणवीसांची भेट


आता नाणार रिफायनरी समर्थक कोकणातील नाणार येथे रिफायनरी करावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. फडणवीस यांच्या भेटीसाठी रिफायनरी समर्थकांनी प्रयत्न देखील सुरू केले आहेत. त्यामुळे आता बारसू ऐवजी नाणार इथं रिफायनरी करा. जमीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे अशी बाजू फडणवीस यांच्याकडे मांडली जाणार आहे. मुख्यमंत्री आम्हाला नक्की भेटीची वेळ देतील अशी आशा रिफायनरी समर्थकांना आहे.

Comments
Add Comment

वसई-विरारमध्ये ऑटोरिक्षा-टॅक्सींसाठी मीटर बंधनकारक

१५ नोव्हेंबरनंतर मीटरशिवाय भाडे घेतल्यास थेट कारवाई. मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय; ठाणे, कल्याणसाठी

निवडणूक आयुक्त म्हणतात, मतदार यादीत बदल करणं 'आमचं कामच नाही'!

सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीनंतर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्पष्टीकरण मुंबई: स्थानिक स्वराज्य

योगी सरकारची उत्तर प्रदेशातील १.८६ कोटी महिलांना 'ही' दिवाळी भेट!

लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील १.८६ कोटी माता-भगिनींना

गोरेगाव गोकुळधामसह आसपासच्या परिसरात अपुरा पाणी पुरवठा, नागरिकांना टँकरने मागण्याची आली वेळ

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव गोकुळधाम येथील भागांमध्ये मागील काही दिवसांपासून कमी दाबाने होणाऱ्या पाण्याची

व्हीव्हीपॅटवरून रणकंदन! कोण खेळतंय रडीचा डाव?

बॅलेट पेपरची मागणी ते व्हीव्हीपॅटचा हट्ट: 'महाकन्फ्यूज आघाडी' गोंधळलेली मुंबई : महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी

भारत पाकिस्तानचे ज्युनिअर हॉकीपटू आले आमनेसामने आणि घडली 'ही' घटना

मलेशिया : पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी धर्म विचारुन पर्यटकांची हत्या केली. यानंतर आशिया चषक