नायर रुग्णालयातील हृदय शस्त्रक्रिया विभाग आठवडाभरापासून बंद

मुंबई : आठवडाभरापासून नायर रुग्णालयातील हृदय शस्त्रक्रिया विभागातील काही भाग बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे बायपाससारख्या शस्त्रक्रिया होत नसल्याने रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शस्त्रक्रिया विभागासाठी लागणाऱ्या उपकरणांची देयके प्रलंबित राहिल्यामुळे कंत्राटदारांनी उपकरणांचा पुरवठा बंद केला आहे.


मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये १८०० खाटा असून दररोज साडेतीन ते चार हजार रुग्ण बाह्यरुग्ण विभागामध्ये उपचारासाठी येतात. हृदय शस्त्रक्रिया विभागामध्ये दररोज उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. यापैकी काही रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता भासते. हृदय शस्त्रक्रियेसाठी लागणारी महत्त्वपूर्ण उपकरणे नायर रुग्णालय प्रशासनाकडून पुरविण्यात येतात. मात्र रुग्णालयाला ही उपकरणे पुरविणाऱ्या कंत्राटदारांची देयके मागील काही दिवसांपासून प्रलंबित आहेत.



देयके मंजूर होत नसल्याने कंत्राटदारानी उपकरणांचा पुरवठा आठवडाभरपूर्वी अचानक बंद केला. त्यामुळे रुग्णालयामध्ये होणाऱ्या शस्त्रक्रियांपैकी बायपास शस्त्रक्रिया आठवडाभरापासून बंद करण्यात आल्या आहेत. अचानक घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे रुग्णांना नाहक त्रास होत आहे. त्यांना शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात जावे लागत आहे. कंत्राटदाराकडून उपकरणांचा पुरवठा बंद झाल्याने शस्त्रक्रिया बंद कराव्या लागल्याची माहिती नायर रुग्णालयातील सीव्हीटीएस विभागातील एका डॉक्टरने दिली.

Comments
Add Comment

किनारी रस्ता प्रकल्पात पादचारी भुयारी मार्गात छत उभारण्याचा प्रस्ताव फेटाळला

मुंबई: महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील भाग–२ मधील पादचारी भुयारी

नवी मुंबईचा प्रवास वेगवान होणार, ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास आता सिग्नलमुक्त

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी

महापालिकेच्या टाऊनहॉल जिमखान्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथील जुन्या क्रिडा भवनाच्या जागेवर

कुलाबा सांडपाणी प्रकल्पातील प्रक्रिया ३ दशलक्ष लिटर पाण्याची होणार विक्री

मुंबई: कुलाबा मल जल प्रक्रिया केंद्रात प्रकल्पातून पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी प्राप्त होणाऱ्या १० दशलक्ष

मिठी नदीच्या कामाला येत्या १ एप्रिलपासून होणार सुरुवात

मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आतापर्यंत कंपन्याच

मुंबईत आतापर्यंत सुमारे ८८ टक्के मालमत्ता कर वसुली

मुंबई: मंगळवार २४ मार्च २०२६ पर्यंत एकूण ६ हजार ४४९ कोटी रुपये म्हणजेच निर्धारित उद्दिष्टाच्या ८७.८६ टक्के इतका