Stock Market : अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजार सुरू राहणार

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी (Budget Day) १ फेब्रुवारी २०२५ रोजी शेअर बाजार (Stock Market) सुरू राहणार आहे. भारतीय शेअर बाजार (Share Market) निर्देशांक (एनएसई) आणि मुंबई शेअर बाजार निर्देशांक (बीएसई) नियमीत वेळेनुसार सुरू राहणार आहेत. साधारणतः शनिवारी आणि रविवारी शेअर बाजार बंद राहतात. परंतु, अर्थसंकल्पाच्या दिवशी शनिवार असूनही बाजार नियमित वेळेनुसार लाईव्ह ट्रेडिंग सत्र करणार आहेत. अर्थसंकल्पातील घोषणांवर गुंतवणूकदारांकडून वेळेवर प्रतिसाद मिळणे, हा यामागील उद्देश आहे.


अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी २०२५ रोजी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. अर्थमंत्री म्हणून सीतारामन यांचे हे सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादरीकरण असेल. अर्थमंत्री आणि त्यांच्या टीमने अर्थसंकल्प २०२५ची तयारी सुरु केली आहे.



यासंदर्भात एक्सचेंजने जारी केलेल्या परिपत्रकानुसार केंद्रीय अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाच्या दिवशी १ फेब्रुवारी २०२५ रोजी थेट ट्रेडिंग सत्र आयोजित केले जाईल. सेटलमेंटच्या सुट्टीमुळे १ फेब्रुवारी २०२५ रोजी 'टीओ' सत्र ट्रेडिंगसाठी शेड्यूल केले जाणार नसल्याचे एनएसईने नमूद केले आहे.


इक्विटी मार्केटमध्ये दुपारी ३.३० वाजेपर्यंत नियमित ट्रेडिंग सत्र असणार आहे. तर कमोडिटी डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सत्र असेल.


यापूर्वी देखील अशा हाय- इम्पॅक्ट इव्हेंटच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार खुला ठेवण्यात आला होता. उल्लेखनीय बाब म्हणजे, २०२० आणि २०१५ मध्ये देखील शनिवारी अर्थसंकल्प सादर झाला होता आणि तेव्हा देखील ट्रेडिंग सत्र आयोजित करण्यात आले होते.


अर्थसंकल्पाचा दिवस हा शेअर बाजारासाठीदेखील महत्त्वाचा मानला जातो. कारण केंद्रीय अर्थसंकल्पातून सरकारची आर्थिक धोरणे, कर आकारणी आणि क्षेत्रनिहाय निधीच्या वाटपाची रूपरेषा जाहीर केली जाते. याचा उद्योग आणि गुंतवणूकदारांच्या भावनांवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो.

Comments
Add Comment

बिहार निवडणूक पराभवाचा फटका: रोहिणी आचार्यने RJD आणि कुटुंबाचा त्याग केला

मुंबई : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत RJD च्या मोठ्या पराभवानंतर लालू प्रसाद यादवांच्या कुटुंबात तणाव वाढला आहे.

चिराग पासवानांनी घेतली नितीश कुमारांची भेट! एनडीएमध्ये विकासाची नवी समीकरणे?

Bihar election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या दमदार विजयामुळे राज्याच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना

सनातन एकता पदयात्रेदरम्यान बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांची प्रकृती चिंताजनक

मथुरा : सनातन एकता पदयात्रेच्या आठव्या दिवशी बागेश्वर धामाचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ

Delhi Crime : धक्कादायक! चालत्या गाडीत विवाहित प्रेयसीची क्रूर हत्या; थेट शीर कापले, मृतदेह नाल्यात फेकला अन्...

दिल्ली : नोएडामध्ये घडलेल्या एका भीषण हत्याकांडाने संपूर्ण परिसर तसेच पोलीस प्रशासनाला हादरवून सोडले आहे.

PM Kisan Yojana : बिहारमध्ये 'विजयाच्या त्सुनामी'नंतर PM मोदींचं मोठं गिफ्ट! ११ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे

बिहार : बिहार निवडणुकीत एनडीएच्या भव्य विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष

राजस्थानचा कर्णधार सीएसकेत, तर जड्डू पुन्हा जुन्या संघात

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर