Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांचा आज सिंधुदुर्ग दौरा; होणार जंगी स्वागत!

कणकवली : राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सिंधुदुर्गचे सुपुत्र व कणकवलीचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) प्रथमच आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर अणार आहेत. त्याचे खारेपाटण ते दोडामार्ग व्हाया देवगडपर्यंत ठिकठिकाणी जंगी स्वागत होणार आहे. कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या स्वागताची जिल्हा भाजपाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून संपूर्ण जिल्हाभर त्यांचे अभिनंदन करणारे आणि शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले आहेत. तसेच त्यांचे कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर भव्य सत्कार सोहळा देखील केला जाणार आहे.



कसं असेल स्वागत कार्यक्रम?



  • कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचे हेलीकॉप्टरने राजापुर येथे आगमन झाले असून त्यानंतर ते सिंधुदुर्गकडे प्रयाण करणार आहेत. तसेच खारेपाटण येथे जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर त्यांचे भव्य स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर ११ वाजून ३० मिनिट ते १२ वाजेच्या कालावधीत देवगड भाजप कार्यालयात स्वागत होणार आहे.

  • दुपारी १२ वाजून १५ मिनिट ते १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत तळेबाजार तर दुपारी १२ वाजून ४५ मिनिट ते १ वाजेच्या सुमारास शिरगाव बाजारपेठ येथे स्वागत होणार आहे. दुपारी दीड वाजेच्या सुमारास नांदगाव बाजारपेठ येथे स्वागत होणार आहे. त्यानंतर दुपारी २ ते  अडीच वाजेच्या सुमारास सिंधुदुर्गनगरी येथील भाजप कार्यालयात स्वागत होणार आहे. तसेच ३ वाजेच्या सुमारास सिंधुदुर्ग बँकेसह सावंतवाडी बांदा येथे स्वागत समारंभ होणार आहे.

  • त्यानंतर मंत्री राणे दोडामार्गकडे रवाना होणार आहेत. तेथे सायंकाळी ६ ते ७ वाजेच्या सुमारास कुडाळ येथे त्यांचे जंगी स्वागत होणार आहे. त्यानंतर कणकवलीकडे रवाना होणार असून सायंकाळी ७ वाजून ३० मिनिट ते ९ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास कणकवली उपजिल्हा रुग्णालया समोरील मैदानावर त्यांचा भव्य सत्कार होणार आहे.

Comments
Add Comment

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये