Kalyan Crime : कल्याणमध्ये परप्रांतीयांची दादागिरी सुरुच! चिमुकलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्याला जाब विचारल्यामुळे मराठी कुटुंबाला मारहाण

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कल्याणमध्ये एका परप्रांतियांनी मराठी कुटुंबाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली होती. मात्र कल्याणमध्ये अजूनही परप्रांतीयांची दादागिरी सुरुच असल्याचे दिसून येत आहे. चिमुकलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्याला मराठी कुटुंबातील माणसांनी जाब विचारल्यामुळे मारहाण केली आहे. (Kalyan Crime)



मराठी कुटुंबातील चार वर्षीय मुलीशी अश्लील चाळे केल्याची माहिती चिमुकलीच्या कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांनी जाब विचारण्यास सुरुवात केली. मात्र, जाब विचारण्यास गेलेल्या कुटुंबास उत्तम पांडे आणि त्याच्या पत्नीकडून जबर मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीत मराठी तरुण जखमी झाला आहे तर तरुणाच्या पत्नीला व आईला देखील मारहाण करण्यात आली आहे. याशिवाय यामध्ये पोलीस कर्मचारी सुद्धा जखमी झाले आहेत.


उत्तम पांडे असे मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याच्या पत्नीने देखील मारहाण केली आहे. या प्रकरणी पांडे पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. (Kalyan Crime)

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.