Drugs: मुंबई विमानतळावर तब्बल ११ कोटींहून अधिक किंमतीचा गांजा जप्त, एका व्यक्तीला अटक

मुंबई: मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी १९-२० डिसेंबरच्या रात्री बँकॉकहून येणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल ११ कोटीहून अधिक किंमतीचा गांजा जप्त केला. प्रवाशाला ११.३२२ किलोग्रॅम संशयित हायड्रोपोनिक गांज्यासह पकडण्यात आले. याची किंमत तब्बल ११.३२ कोटी रूपये आहे.


न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार, कस्टम अधिकाऱ्यांनी गुप्त सूचनांच्या मदतीने प्रवाशाचे प्रोफाईलिंग केले आणि तपासादरम्यान प्रवाशाच्या ट्रॉली बॅगच्या आत व्हॅक्युम सील प्लास्टिक पाऊचमध्ये लपवलेले अवैध पदार्थ ताब्यात घेतले. हायड्रोपोनिक गांजा हा नशेचा पदार्थ आहे. याची बाजारात किंमत अधिक आहे.



२ किलोपेक्षा अधिक सोने जप्त


मुंबई विमानतळावर सीमा शुक्ल विभागाने १८-१९ डिसेंबरदरम्यान सोन्याच्या तस्करींची दोन प्रकरणे पकडली. अधिकाऱ्यांनी एकूण २.०७३ किलो २४ कॅरेट सोने जप्त केले.मुंबईच्या कस्टम अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार १८-१९ डिसेंबरला मुंबईच्या CSMI एअरपोर्टवर अधिकाऱ्यांनी २ प्रकरणांमध्ये १.४८ कोटी रूपयांचे २.०७३ किलो सोने जप्त केले. सोने या प्रवाशांनी आपल्या शरीरात लपवले होते. तर दुसऱ्या प्रकरणात सोने एअरपोर्टवरील एका कर्मचाऱ्याकडूनच जप्त करण्यात आले. या प्रकरणात दोन लोकांना अटक करण्यात आली.

Comments
Add Comment

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.

नारळासाठी ४५ रुपयांची फोडणी; आवक घटल्याने मुंबईकरांना भुर्दंड

मुंबई : सण, उत्सव कालावधीत नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईकरांना सध्या या नारळासाठी ४५ ते ५० रुपये मोजावे