Akhilesh Shukla : सरकार अशा माजोरड्यांचा माज उतरल्याशिवाय रहाणार नाही; मराठी कुटुंबाला मारहाण करणारा अखिलेश शुक्ला निलंबित! - मुख्यमंत्री

नागपूर : कल्याण येथे मराठी माणसांविषयी गरळ ओकत एका मराठी कुटुंबाला मारहाण करणार्‍या अखिलेश शुक्ला (Akhilesh Shukla) नावाच्या परप्रांतीय व्यक्तीला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातून निलंबित केले आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधान परिषदेत केली.



कल्याण येथील योगीधाम परिसरातील ‘अजमेरा हाईट्स’मध्ये रहाणार्‍या अखिलेश शुक्ला यांनी त्यांच्या शेजारी रहाणार्‍या देशमुख कुटुंबियांना गुंडांकरवी मारहाण केली होती. या घटनेचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला होता. त्यानंतर पोलिसांनी शुक्लावर गुन्हा नोंद केला; पण त्यांना अटक करण्यात दिरंगाई झाली. त्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती. विरोधकांनी हे सूत्र विधान परिषदेच्या पटलावर मांडले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्तृत निवेदन करत वरील घोषणा केली. या वेळी त्यांनी सभागृहाला मुंबई आणि परिसरातील मराठी माणसांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली.



शुक्ला कुटुंबावर गुन्हा नोंद!


देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, अखिलेश शुक्ला हा ‘एम.टी.डी.सी.’चा कर्मचारी आहे. त्याच्यासह त्याच्या पत्नीवर मराठी कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर खडकपाडा ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तक्रारीची प्रत माझ्याकडे आहे. त्याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई चालू करण्यात आली आहे. पुढील कारवाई पोलीस करतील. या प्रकरणी कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही.



मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसांचाच आहे, होता आणि राहील. कधीकधी काही नमुणे अशी चुकीची विधाने करतात, माज आणल्यासारखे वागतात; पण सरकार अशा (Akhilesh Shukla) माजोरड्यांचा माज उतरल्याशिवाय रहाणार नाही. राष्ट्रीय अस्मितेनंतर मराठी ही आपली क्षेत्रिय अस्मिता आहे. त्यावर कुणी घाला घालणार असेल, तर त्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल. मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही.

Comments
Add Comment

ऑरेंज गेट ते मरिन ड्राईव्ह बोगद्याचे काम डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

केंद्राकडून ६८ कोटींचा निधी उपलब्ध मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासह जलद प्रवासासाठी ऑरेंज गेट ते मरीन

नको सुट्ट्या पैशाची कटकट... तिकीट काढा झटपट...!

एसटीच्या यूपीआयमार्फत तिकीट विक्रीला प्रवाशांची वाढती पसंती मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी)

दहिसर-काशीगाव ‘मेट्रो ९’ टप्पा लवकरच सुरू होणार

सीएमआरएस चाचण्या अंतिम टप्प्यात मुंबई : 'दहिसर -भाईंदर मेट्रो ९' मार्गिकेतील दहिसर–काशीगाव टप्प्यातील सुरक्षा

राज्यातील २९ लाख विद्यार्थी अपार आयडी नोंदणीविना

मुंबई : राज्यातील सुमारे २९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची अद्याप अपार आयडी नोंदणी झालेली नाही. त्यामुळे या

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात १२ स्थानके आणि तीन डेपो

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा माऊंटन टनेल-५ च्या यशस्वी कामामुळे ठाणे आणि अहमदाबाद

मुंबईत माजी आमदार डॉ. अशोक मोडक यांचे निधन

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेतील माजी आमदार, अभाविपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक मोडक यांचे