Mumbai Central ST Bus Depo : मुंबई सेंट्रल बस स्थानकात सोमवारपासून काँक्रिटीकरण सुरू

  222

काही बस फेऱ्या जवळच्या बसस्थानकात स्थलांतरीत!


मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुंबई सेंट्रल (एसटी) बसस्थानक (Mumbai Central ST Bus Depo) परिसराचे काँक्रीटीकरण करण्याचे काम २३ डिसेंबर पासून सुरू होणार आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई सेंट्रल बसस्थानकातून सुटणाऱ्या बाहेरील आगाराच्या बसेसच्या फेऱ्या २३ डिसेंबर पासून टप्प्याटप्प्याने पुढील दोन महिन्यासाठी परळ, दादर व कुर्ला नेहरूनगर बसस्थानकातून सोडण्यात येणार आहेत. तथापि, मुंबई आगाराच्या फेऱ्या याच बसस्थानकातून सोडण्यात येणार आहेत.


महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकार्याने एसटीच्या राज्यभरातील १८३ बसस्थानकांच्या परिसराचे काँक्रीटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे ६०० कोटी रुपये एमआयडीसी मार्फत खर्च करण्यात येणार आहेत. अनेक बसस्थानक परिसराचे काम सध्या प्रगतीपथावर असून त्या अंतर्गत मुंबई सेंट्रल येथील बसस्थानक परिसराचे काँक्रिटीकरण लवकरच सुरू होणार आहे.



सुमारे १९०० चौरस मीटर इतक्या परिसराचे पूर्ण काँक्रीटीकरण करण्यात येणार असून त्यासाठी १ कोटी ६४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर बस स्थानक परिसरात खड्डे पडणे, पाणी साचणे, धुळ उडणे अशा समस्यांना कायमस्वरूपी तिलांजली मिळणार आहे.


तथापि, राज्यभरातून बाहेरील आगाराच्या सुमारे १५५ बस फेऱ्या मुंबई सेंट्रल येथे दिवसभरात येतात. त्यातून शेकडो प्रवासी मुंबई सेंट्रल बसस्थानक परिसरामध्ये उतरत असतात. काँक्रिटीकरणाच्या कामामुळे त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी या फेऱ्या जवळच्या परळ, दादर व कुर्ला नेहरूनगर बस स्थानकामध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर पूर्वीप्रमाणे या सर्व फेऱ्या मुंबई बसस्थानकातून (Mumbai Central ST Bus Depo) सुरू राहतील, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.