Virat kohli : मेलबर्न एअरपोर्टवर विराट कोहलीचा महिलेसोबत जोरदार वाद

मेलबर्न : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी निमित्त विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलियात आहे. गाबा टेस्ट संपल्यानंतर टीम इंडिया मेलबर्नला पोहोचली आहे. मेलबर्नला दाखल होताच एअरपोर्टवर विराट कोहलीचा एका महिला पत्रकारासोबत वाद झाला आहे. विराट कोहलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराट कोहलीला महिला पत्रकाराचा राग का आला? या वादाचे नेमके कारण आता समोर आले आहे.



मेलबर्नमध्ये दाखल होताच विराट कोहलीचा एका महिला पत्रकारासोबत वाद झाला आहे. ऑस्ट्रेलियन पत्रकाराने विराट कोहलीच्या मुलांचे फोटो काढले त्यावरुन हा दिग्गज क्रिकेटर त्या महिला पत्रकारासोबत बराच वेळ वाद घालत होता. विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका महिला पत्रकाराशी वाद घालताना दिसतो. विराट बोलत असताना खूप रागात दिसत आहे. यानंतर विराट कोहली ऑस्ट्रेलियन पत्रकारांना सांगतो की, तुम्ही लोक माझ्या परवानगीशिवाय माझ्या मुलांचे फोटो काढू शकत नाही. पण चॅनल7 ने दावा केला आहे की, त्यांच्या मुलांचे कोणतेही फोटो क्लिक केलेले नाहीत किंवा त्यांचे व्हिडिओ बनवले गेले नाहीत. विराट कोहलीने सर्वांना सांगितले की त्याला प्रायव्हसीची आवश्यकता आहे आणि त्याच्या परवानगीशिवाय कोणीही त्याच्या मुलांचा व्हिडिओ बनवू शकत नाही.





दरम्यान, विराट कोहलीच्या ऑस्ट्रेलियन पत्रकार आणि फोटो पत्रकारांशी झालेल्या वादाचा मुद्दा संपूर्ण ऑस्ट्रेलियात गाजला. ऑस्ट्रेलियन मीडिया विराट कोहलीवर टीका करत आहे. तसे विराट आणि ऑस्ट्रेलियन मीडियाचे संबंध याआधीपासून चांगले नाही आहे. याआधीच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात सुद्धा विराटचा तिथल्या मीडियासोबत वाद झाला आहे. पण यावेळी विषय थोडा वेगळा आहे. मेलबर्नमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियात २६ डिसेंबरपासून चौथा कसोटी सामना सुरु होणार आहे. टेस्ट सीरीज सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. ब्रिसबेन टेस्ट मॅच ड्रॉ झाली आहे.आता यांनतर मेलबर्नमध्ये मालिकेत कोण आघाडी घेतो? त्याची उत्सुकता सर्वाना लागून राहिली आहे.

Comments
Add Comment

भारत आणि रशिया दरम्यान महत्त्वाचा करार, चीनच्या चिंतेत वाढ

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन चार आणि पाच डिसेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या

अखेर इमरान खान आणि बहिणीची २० मिनिटे झाली भेट, इमरानने बहिणीला दिली धक्कादायक माहिती

रावळपिंडी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान जिवंत आहेत. इमरान यांच्या पक्षाने तीव्र आंदोलन सुरू केल्यानंतर

पाकिस्तानने लायकी दाखवली, श्रीलंकेला मदत म्हणून एक्सपायरी झालेल्या वस्तूंची पाठवणी केली

इस्लामाबाद : दितवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक

पाकिस्तान सरकारचे मोठे पाऊल! इम्रान खानबद्दल टीव्ही, इंटरनेटवर चर्चेला बंदी, मुलाची दिली पहिली प्रतिक्रीया

कराची: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकून दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या

दितवाह चक्रीवादळाचा प्रकोप, ३३४ जणांचा मृत्यू; भारत श्रीलंकेच्या मदतीसाठी धावला

कोलंबो(वृत्तसंस्था):श्रीलंका सध्या शतकातील सर्वात मोठ्या आपत्तीचा सामना करत आहे कारण दितवाह चक्रीवादळाने

पाकिस्तानमध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात! असीम मुनीर यांच्या सीडीएफ नियुक्ती आधीच शाहबाज गेले परदेशात पळून

कराची: पाकिस्तानमध्ये लष्करी नेतृत्वाबाबत एक मोठे संवैधानिक आणि प्रशासकीय संकट निर्माण झाले आहे. फील्ड मार्शल