Mumbai Gateway Accident: स्पीडमध्ये असलेल्या नौदलाच्या बोटीने प्रवासी बोटीला मारली धडक, पाहा Video

मुंबई:मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियासमोर बुधवारी मोठा अपघात घडला. येथे ८० प्रवासी आणि चालक दलासह ५ जणांना घेऊन जाणारी बोट पलटली. या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला ७७ जणांना वाचवण्यात यश आले. तर काहीजण अद्याप बेपत्ता आहेत. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.


यात दिसत आहे की नौदलाची एक बोट वेगाने या बोटीच्या दिशेने येते आणि जोरदार धडक देते. मीडियाच्या रिपोर्टनुसार यात ७७ जणांना वाचवण्यात यश आले आहे तर २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. नीलकमल नावाची ही प्रवाशांना घेऊन गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटाच्या दिशेने जात होती.





सुरक्षा रक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, नौदल आणि तटरक्षक दलाच्या जवानांनी मोठ्या प्रमाणात अभियान सुरू केले. यात नौदलाच्या ११ बोटी आणि मरीन पोलिसांच्या तीन बोटींचा तसेच तटरक्षक दलाच्या एका बोटीचा यात समावेश होता. तसेच बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी चार हेलिकॉप्टरचा समावेश आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील

कोस्टल रोडच्या जोड रस्त्यांच्या बांधकामातील अडथळे दूर, जोड रस्त्याचे काम पूर्ण होताच लोखंडवाला, सात बंगल्यातील नागरिकांचा प्रवास सुकर

मुंबई (खास प्रतिनिधी) : कोस्टल रोड (उत्तर)ला जोडल्या जाणाऱ्या अतिरिक्त पुलाच्या जोडणीचे काम मागील दीड वर्षांपासून

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

महाराष्ट्र सागरी मंडळाचे २६० कोटींचे सामंजस्य करार

हरित बंदर विकास विषयी डेन्मार्कच्या कंपनीसोबत मंत्री नितेश राणे यांची सविस्तर चर्चा मुंबई : नेस्को गोरेगाव

बोगस आधार कार्ड प्रकरणी आ. रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बोगस आधार कार्ड तयार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी

मोबाईल ग्राहकवाढीत जिओ आघाडीवर; एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर

रायगड : महाराष्ट्रात मोबाईल ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत असून, सप्टेंबर महिन्यात रिलायन्स जिओने सर्वाधिक