मुंबई:मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियासमोर बुधवारी मोठा अपघात घडला. येथे ८० प्रवासी आणि चालक दलासह ५ जणांना घेऊन जाणारी बोट पलटली. या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला ७७ जणांना वाचवण्यात यश आले. तर काहीजण अद्याप बेपत्ता आहेत. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
यात दिसत आहे की नौदलाची एक बोट वेगाने या बोटीच्या दिशेने येते आणि जोरदार धडक देते. मीडियाच्या रिपोर्टनुसार यात ७७ जणांना वाचवण्यात यश आले आहे तर २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. नीलकमल नावाची ही प्रवाशांना घेऊन गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटाच्या दिशेने जात होती.
This video captures the moment when a speed boat dashed into a passenger boat near gateway of India, causing the passenger boat to capsize. As many as 60 people are believed to be on board. Many rescued, some missing. Rescue operation underway. pic.twitter.com/cn2nHQ2hZn
— Radhika Ramaswamy (@radhika1705) December 18, 2024
सुरक्षा रक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, नौदल आणि तटरक्षक दलाच्या जवानांनी मोठ्या प्रमाणात अभियान सुरू केले. यात नौदलाच्या ११ बोटी आणि मरीन पोलिसांच्या तीन बोटींचा तसेच तटरक्षक दलाच्या एका बोटीचा यात समावेश होता. तसेच बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी चार हेलिकॉप्टरचा समावेश आहे.