Kurla BEST Accident : मुंबईत पुन्हा बेस्टचा अपघात, २५ वर्षीय युवकाचा मृत्यू

मुंबई :  मुंबईत बेस्ट बसने पुन्हा एकदा अपघात घडवून आणला आहे. शिवाजीनगर ते कुर्ला मार्गावर प्रवास करत असताना या बसने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये २५ वर्षीय युवक गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. दीक्षित विनोद राजपूत असे २५ वर्षीय मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीव्हीजी ग्रुपच्या ओला भाडेतत्त्वावरील बसचा गोवंडी येथील शिवाजी नगरमध्ये भीषण अपघात झाला आहे. शनिवारी (१४ डिसेंबर) रात्री साडे अकराच्या सुमारास बस क्रमांक A350 ही बस गोवंडीतील शिवाजीनगर बस डेपोतून कुर्ला येथे जाण्यासाठी निघाली होती. रात्री १२.१५ च्या सुमारास शिवाजी नागर जंक्शन हायवे बस स्टॉपच्या पुढे सदर बसला उजव्या बाजूने एक दुचाकी ओव्हरटेक करत असताना अपघात घडला आहे. दुचाकीवरील तरुण बसच्या मागील चाकाखाली आला. यावेळीच बसचा मागील बाजूचा टायर फुटला आणि तरुणाच्या डोक्याला दुखापत झाली. जखमी व्यक्तीला पोलिसांनी व्हॅन टाकून तातडीने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ३९ वर्षीय विनोद आबाजी रणखांबे हे बसचालक असून 39 वर्षीय अविनाश विक्रमराव गिते हे अपघातग्रस्त बसवर कंडक्टर होते.




मुंबईतील बेस्ट बस अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या आठ महिन्यांत बेस्ट बस अपघातांमध्ये एकूण २२ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. यामुळे प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टीने बेस्ट प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.याआधी कुर्ला येथे घडलेल्या एका बेस्ट बस अपघाताने मुंबईकरांना हादरवून सोडले होते. इलेक्ट्रिक बसने नियंत्रण सुटल्याने त्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला, तर ४२ जण गंभीर जखमी झाले होते. २० पेक्षा जास्त वाहने या अपघातात पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती.या अपघाताच्या संदर्भात, बस चालक संजय मोरे याला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीत समोर आले की मोरे याला इलेक्ट्रिक बस चालवण्याचा पुरेसा अनुभव नव्हता. फक्त एक दिवसाचे प्रशिक्षण आणि तीन वेळा बस चालवण्याचा सराव करूनच त्याला रस्त्यावर बस चालवण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

Comments
Add Comment

Dharavi Development Project : धारावी विकास प्रकल्पांत तब्बल ८ हजार झाडे होणार बाधित

- पालघरमध्ये २३ हजार तर धारावीतच लावली जाणार ३० हजार झाडे मुंबई (सचिन धानजी) धारावीचा विकास करण्यासाठी

Byculla Police Station Fire: भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाकडून तातडीने नियंत्रण

मुंबई: मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही आग पोलीस ठाण्याच्या पहिल्या

Eknath Shinde : ठाणे शहरातील सर्वात मोठ्या वाहतूक सुधारणा प्रकल्पाला प्रारंभ; तीन हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन

ठाणेकरांच्या स्वप्नपूर्तीकडे एकनाथ शिंदेंचे आणखी एक मोठे पाऊल २०० कोटींच्या महत्त्वाकांक्षी कामामुळे दीड

Ashadhi Wari : आषाढी वारीत ७.४७ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; मधुमेह, ताप, उच्च रक्तदाबासह विविध आजारांवर प्रभावी उपचार

मुंबई  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच

Mumbai Crime News : मुंबई विमानतळ परिसरातील हॉटेलमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार; अहमदाबादच्या व्यावसायिकाला अटक

मुंबई : मुंबई शहरातील विमानतळ परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नामांकित हॉटेलमध्ये महिलेवर

Mumbai News : मुंबईकरांना मोठा दिलासा! घाटकोपरमध्ये उभारला जाणार नवा केबल-स्टेड पूल, 2027 पर्यंत काम पूर्ण होण्याचे लक्ष्य