PM Modi : संविधानाला नख लावणाऱ्या काँग्रेसने लोकशाहीचा गळा घोटला

पंतप्रधान नरेंद्र मोदींची पंडीत नेहरु, इंदिरा गांधींच्या निर्णयावर टीका


नवी दिल्ली : जेव्हा देश संविधानाची २५ वर्ष पूर्ण केली होती त्यावेळी आमच्या देशात संविधानाला नख लावण्यात आले. देशात आणीबाणी लावण्यात आली. पत्रकारितेचे स्वातंत्र्य संपवण्यात आले, काँग्रेसचे हे पाप कधी धुतले जाणार नाही. काँग्रेसच्या एका कुटुंबानं संविधानाला धक्का देण्यामध्ये गेल्या ५५ वर्षात काही सोडले नाही. काँग्रेसने लोकशाहीचा गळा घोटला. आणीबाणीच्या काळात देशाला तुरुंग बनवण्यात आले होते, असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पंडीत नेहरु व इंदिरा गांधींच्या निर्णयावर टीका केली.


लोकसभेत संविधानाच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सरकारच्या निर्णयांची माहिती दिली. भारताच्या संविधानाच्या ७५व्या वर्षानिमित्त लोकसभेतील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं. यावेळी बोलताना मोदींनी पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी यांच्यासह काँग्रेसवर सडकून टीका केली. आणीबाणीच्या दिवसांचीही आठवण मोदींनी काढली.


काँग्रेसच्या एका कुटुंबाने संविधानाला धक्का दिल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, मी संविधानामुळे इथपर्यंत पोहोचलो आहे, संविधानामुळे आमच्यासारखे लोक पंतप्रधान झाले. जवाहरलाल नेहरु यांनी १९५१ मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला केला. काही लोकांनी अपयशाचे दु:ख प्रकट केले. जवाहरलाल नेहरु यांनी त्यावेळी मुख्यमंत्र्यांना चिठ्ठी लिहून मुख्यमंत्र्यांना म्हटले की, संविधान आपल्या रस्त्यात आले तर कोणत्याही परिस्थितीत संविधानात बदल करावा लागेल, असे म्हटले होते. काँग्रेसने वेळोवेळी संविधानावर हल्ले केले. ६० वर्षात ७५ वेळा संविधान बदलण्यात आले. जवाहरलाल नेहरु यांनी १९५१ मध्ये मागच्या दाराने संविधान बदलले. नेहरु आपले संविधान चालवत होते. इंदिरा गांधी यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलला, आणीबाणी लागू करुन अधिकार हिरावून घेण्यात आले. न्यायव्यवस्थेचा गळा घोटण्यात आला. खुर्ची वाचवण्यासाठी आणीबाणी लावण्यात आली, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.

आणीबाणीच्या काळात लोकशाही संपविण्याचे काम


सर्व शंका दूर करत संविधान आपल्याला इथंपर्यंत घेऊन आले. भारताला लोकशाहीची जननी म्हणून ओळखले जाते. महान देशासाठी लोकशाहीची व्यवस्था नवी नाही. आज सर्वच क्षेत्रात महिला या आघाडीवर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रत्येकाने आभार मानले पाहिजेत. महिलाशक्तीला अधिक सशक्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. महिलांबाबतचे कायदे आम्ही आणले. देशाच्या एकतेत ३७० कलम अडसर होते. आयुष्मान कार्डचा गोरगरीबांना मोठा फायदा झाला. आमच्या संविधान एकात्मता आणि एकता आहे. भारताला विकसित करण्याचा संकल्प आहे. संविधान निर्मात्यांनी आम्हाला दिशा दाखवली. स्वातंत्र्यानंतर देशाच्या एकात्मतेवर प्रहार झाला. देशातील एकता ही आमची प्राथमिकता आहे. आणीबाणीच्या काळात लोकशाही संपवण्याचे काम झाले असल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केली.


संविधानाची हत्तीवरुन मिरवणूक काढली होती


२६ नोव्हेंबरला देशभरात संविधानाचे पन्नासावे वर्षे साजरे केले. अटल बिहारी वाजपेयींनी पंतप्रधानांच्या नात्याने एकतेचा संदेश दिला होता. संविधानाला ६० वर्षे झाल्यानंतर आम्ही गुजरातमध्ये ते वर्ष साजरे केले. तेव्हा आम्ही संविधान ग्रंथाची हत्तीच्या अंबारीवरुन मिरवणूक काढली. राज्याचे मुख्यमंत्री संविधानाच्या खाली, हत्तीच्या बाजूला रस्त्यावरुन चालत होता. देशाला संविधानाचे महत्त्व कळावे, यासाठी प्रयत्न करत होता. हे सौभाग्य मला मिळाले, अशीही आठवण मोदींनी सांगितले.

Comments
Add Comment

FSSAI ची मोठी कारवाई! खाद्यपदार्थांच्या पॅकिंगमध्ये स्टेपल पिन, मेटल वायरला बंदी; नियम मोडल्यास दंडाची कारवाई

मुंबई : ग्राहकांच्या आरोग्य आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI)

Madhya Pradesh : अफवा पसरली आणि रेल्वे रुळावर मोठी दुर्घटना झाली

मोरेना : मध्य प्रदेशमधील मोरेना जिल्ह्यातील हेतमपूर - घेर विभागाजवळ अफवा पसरल्यामुळे रेल्वे रुळावर मोठी

NDA : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एनडीएच्या पहिल्या बॅचमध्ये १४ महिला अधिकारी सज्ज

देहरादून : सर्वोच्च न्यायालयाच्या २०२१ मधील ऐतिहासिक निर्णयामुळे नॅशनल डिफेन्स अकादमीमध्ये (एनडीए) महिलांच्या

Virat-1' ship sinks off : ओमानच्या किनाऱ्याजवळ 'विराट-१' जहाज बुडाले, अमेरिकी नौदलाकडून १४ भारतीय खलाशांची सुटका

नवी दिल्ली : आखाती प्रदेशात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, आणखी एक मोठा सागरी अपघात घडला आहे. भारतीय जहाज

E100 Fuel Nitin Gadkari : "काल रात्री ८ वाजता फाईलवर सही केली"; E100 इंधनाला हिरवा कंदील, नितीन गडकरींची मोठी घोषणा

पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक तेलबाजारात अस्थिरता वाढत असताना भारताने पर्यायी इंधनाच्या

Indian Army Uniform 2026 : ब्रिटिशकालीन परंपरांना रामराम! भारतीय लष्कराच्या गणवेशात मोठे बदल; ‘बंदी जॅकेट’ला मान्यता

भारतीय लष्कराने (Indian Army) वसाहतकालीन परंपरांपासून दूर जात आपल्या गणवेश संहितेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. औपचारिक