PM Modi : संविधानाला नख लावणाऱ्या काँग्रेसने लोकशाहीचा गळा घोटला

पंतप्रधान नरेंद्र मोदींची पंडीत नेहरु, इंदिरा गांधींच्या निर्णयावर टीका


नवी दिल्ली : जेव्हा देश संविधानाची २५ वर्ष पूर्ण केली होती त्यावेळी आमच्या देशात संविधानाला नख लावण्यात आले. देशात आणीबाणी लावण्यात आली. पत्रकारितेचे स्वातंत्र्य संपवण्यात आले, काँग्रेसचे हे पाप कधी धुतले जाणार नाही. काँग्रेसच्या एका कुटुंबानं संविधानाला धक्का देण्यामध्ये गेल्या ५५ वर्षात काही सोडले नाही. काँग्रेसने लोकशाहीचा गळा घोटला. आणीबाणीच्या काळात देशाला तुरुंग बनवण्यात आले होते, असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पंडीत नेहरु व इंदिरा गांधींच्या निर्णयावर टीका केली.


लोकसभेत संविधानाच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सरकारच्या निर्णयांची माहिती दिली. भारताच्या संविधानाच्या ७५व्या वर्षानिमित्त लोकसभेतील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं. यावेळी बोलताना मोदींनी पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी यांच्यासह काँग्रेसवर सडकून टीका केली. आणीबाणीच्या दिवसांचीही आठवण मोदींनी काढली.


काँग्रेसच्या एका कुटुंबाने संविधानाला धक्का दिल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, मी संविधानामुळे इथपर्यंत पोहोचलो आहे, संविधानामुळे आमच्यासारखे लोक पंतप्रधान झाले. जवाहरलाल नेहरु यांनी १९५१ मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला केला. काही लोकांनी अपयशाचे दु:ख प्रकट केले. जवाहरलाल नेहरु यांनी त्यावेळी मुख्यमंत्र्यांना चिठ्ठी लिहून मुख्यमंत्र्यांना म्हटले की, संविधान आपल्या रस्त्यात आले तर कोणत्याही परिस्थितीत संविधानात बदल करावा लागेल, असे म्हटले होते. काँग्रेसने वेळोवेळी संविधानावर हल्ले केले. ६० वर्षात ७५ वेळा संविधान बदलण्यात आले. जवाहरलाल नेहरु यांनी १९५१ मध्ये मागच्या दाराने संविधान बदलले. नेहरु आपले संविधान चालवत होते. इंदिरा गांधी यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलला, आणीबाणी लागू करुन अधिकार हिरावून घेण्यात आले. न्यायव्यवस्थेचा गळा घोटण्यात आला. खुर्ची वाचवण्यासाठी आणीबाणी लावण्यात आली, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.

आणीबाणीच्या काळात लोकशाही संपविण्याचे काम


सर्व शंका दूर करत संविधान आपल्याला इथंपर्यंत घेऊन आले. भारताला लोकशाहीची जननी म्हणून ओळखले जाते. महान देशासाठी लोकशाहीची व्यवस्था नवी नाही. आज सर्वच क्षेत्रात महिला या आघाडीवर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रत्येकाने आभार मानले पाहिजेत. महिलाशक्तीला अधिक सशक्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. महिलांबाबतचे कायदे आम्ही आणले. देशाच्या एकतेत ३७० कलम अडसर होते. आयुष्मान कार्डचा गोरगरीबांना मोठा फायदा झाला. आमच्या संविधान एकात्मता आणि एकता आहे. भारताला विकसित करण्याचा संकल्प आहे. संविधान निर्मात्यांनी आम्हाला दिशा दाखवली. स्वातंत्र्यानंतर देशाच्या एकात्मतेवर प्रहार झाला. देशातील एकता ही आमची प्राथमिकता आहे. आणीबाणीच्या काळात लोकशाही संपवण्याचे काम झाले असल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केली.


संविधानाची हत्तीवरुन मिरवणूक काढली होती


२६ नोव्हेंबरला देशभरात संविधानाचे पन्नासावे वर्षे साजरे केले. अटल बिहारी वाजपेयींनी पंतप्रधानांच्या नात्याने एकतेचा संदेश दिला होता. संविधानाला ६० वर्षे झाल्यानंतर आम्ही गुजरातमध्ये ते वर्ष साजरे केले. तेव्हा आम्ही संविधान ग्रंथाची हत्तीच्या अंबारीवरुन मिरवणूक काढली. राज्याचे मुख्यमंत्री संविधानाच्या खाली, हत्तीच्या बाजूला रस्त्यावरुन चालत होता. देशाला संविधानाचे महत्त्व कळावे, यासाठी प्रयत्न करत होता. हे सौभाग्य मला मिळाले, अशीही आठवण मोदींनी सांगितले.

Comments
Add Comment

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या

Narendra Modi : पंतप्रधान मोदी शुक्रवारी देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला दाखवणार हिरवा झेंडा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकावरून जिंद आणि सोनीपत दरम्यान