वाहतो ही दुर्वांची जुडी'ची ६० वर्षे...

राज चिंचणकर


मराठी रंगभूमीवर विविध प्रकारच्या नाट्यकृती येत असल्या आणि त्यातून रसिकांचे मनोरंजन होत असले; तरी काही नाट्यकृती मात्र संस्कारक्षम म्हणून कायम ओळखल्या गेल्या. यातलीच एक माईलस्टोन नाट्यकृती म्हणजे 'वाहतो ही दुर्वांची जुडी'. नवाक्षरी शीर्षक ही ज्यांच्या नाटकांची खासियत होती, असे ज्येष्ठ रंगकर्मी बाळ कोल्हटकर यांच्या या नाटकाने रसिकजनांवर योग्य संस्कार घडवण्याचे कार्य करून ठेवले असून, यंदा या नाटकाला तब्बल ६० वर्षे झाली आहेत.


बाळ कोल्हटकर यांच्या लेखणीतून उतरलेली ही 'दुर्वांची जुडी' सन १९६४ मध्ये प्रथम रंगभूमीवर आली. या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगात स्वतः बाळ कोल्हटकर यांच्यासोबत आशा काळे यांनी भूमिका रंगवली होती. त्यांच्यासमवेत गणेश सोळंकी, अनंत मिराशी आदी कलावंतही या नाटकात होते. त्यावेळी या नाटकासाठी लेखक, दिग्दर्शक व संगीत दिग्दर्शक अशी तिहेरी जबाबदारी स्वतः बाळ कोल्हटकर यांनी सांभाळली होती. नाट्यपंढरी सांगलीच्या भावे नाट्यमंदिरात या नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता. 'नाट्यमंदिर' या नाट्यसंस्थेने रंगभूमीवर आणलेल्या या नाटकातल्या सुभाष, पठाण, बाळू आपटे, रंगराव आदी पात्रांनी रसिकजनांवर मोहिनी घातली होती.


त्यानंतरच्या काळात इतर काही संस्थांनी हे नाटक रंगभूमीवर आणले. सन १९८४ मध्ये विजय गोखले आणि निवेदिता सराफ यांच्या अभिनयाच्या माध्यमातून हे नाटक रंगभूमीवर आले होते. दहा वर्षांपूर्वी, म्हणजे या नाटकाने जेव्हा वयाची पन्नाशी गाठली; तेव्हा अंशुमन विचारे आणि शलाका पवार या दोघांनी या नाटकात प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. मूळ तीन अंकी असलेले हे नाटक तेव्हाही परंपरा राखत थेट तीन अंकात सादर झाले होते.

Comments
Add Comment

नाटकाच्या प्रयोगासाठी ‘उदकशांत’ करताना...

राजरंग : राज चिंचणकर नाटक हे नाटक असते आणि नाटकांच्या बाबतीत व्यावसायिक व प्रायोगिक असा भेदभाव केला जाऊ नये, अशी

‘गोदावरी’तील समावेश कलाटणी देणारा

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल गौरी नलावडे या अभिनेत्रीचा ‘वडा पाव’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. गौरीचे शालेय

कलात्मक दिग्दर्शक गुरुदत्त

गुरुदत्त हिंदी चित्रपटसृष्टीत जिवंतपणीच आख्यायिका बनलेले व्यक्तिमत्त्व. आजही गुरुदत्त यांचे नाव घेतले की

नाईलाजांच्या प्रदेशातील तीन डिसेबल्स

पाचवा वेद : भालचंद्र कुबल यालेखाचं शीर्षक मुद्दामहून हेच ठेवण्यामागचं कारण असं की परीक्षक म्हणून एकदा का तुम्ही

नाईलाजाच्या प्रदेशातील तीन डिसेबल्स

भालचंद्र कुबल यंदाच्या आय. एन. टी. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेला पन्नास वर्षे पूर्ण झाली. मी या स्पर्धेत

मराठी रंगभूमीचा एकमेव ‘सूत्रधार’...

रंगभूमीवर नाटकांचे सूत्रधार अनेक असतात, पण मराठी रंगभूमीला एखादा सूत्रधार असू शकतो का; या प्रश्नाचे उत्तर आता