Mumbai Water Cut : पाणी जपून वापरा! १४, १५ डिसेंबर रोजी मुंबईसह ठाणे, भिवंडीत १५ टक्के पाणीकपात

मुंबई : हिवाळ्यात मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. १४ डिसेंबर २०२४ ते दिनांक १५ डिसेंबर २०२४ पर्यंत मुंबई शहर , उपनगरांसह ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्यात आला आहे. १५ टक्के पाणी कपात केल्यामुळे आज आणि रविवारी याचा परिणाम होणार आहे.


पिसे विद्युत उपकेंद्रातील मुख्य ट्रान्सफॉर्मर क्रमांक १ च्या बी फेज करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक बिघाड झाला. त्यामुळे पिसे उदंचन केंद्रातील एकूण कार्यरत २० पंपांपैकी ६ उदंचन पंप बंद झाले आहेत. सहा पंपांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. दुरुस्ती काम १४ व १५ डिसेंबर रोजी सुरू राहणार आहे. त्यामुळे मुंबई शहर, उपनगरांसह ठाणे आणि भिवंडी होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्यात आली आहे.



दरम्यान, मुंबई महापालिकेकडून ठाणे आणि भिवंडीतील काही परिसराला पाणीपुरवठा करण्यात येतो. सहा उदंचन पंप बंद पडल्यामुळे ठाणे आणि भिवंडमध्ये करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यातही १५ टक्के पाणी कपात करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली. खबरदारीचा उपाय म्हणून १४ आणि १५ डिसेंबर या कालावधीत नागरिकांनी पाणी काटकसरीने व जपून वापरावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की , त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून उपरोक्त नमूद कालावधीत पाणी काटकसरीने व जपून वापरुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आलं आहे.

Comments
Add Comment

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर (बुलेट ट्रेन) प्रकल्पांतर्गत मुंबईतील वांद्रे कुर्ला

Mumbai Water Storage : 'मुंबई ३' जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर मुंबईकरांसाठी जलाशयांमध्ये किती पाणीसाठी ?

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. या