Cold weather : पुन्हा थंडी आली हो! राज्यातील तापमानाचा पारा घसरला

मुंबई: गायब झालेली थंडी(Winter)राज्यात पुन्हा वाढू लागली आहे. राज्यातील अनेक भागांतील तापमान एका दिवसांत ४ अंशांनी घसरले आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी चांगलाच गारवा जाणवत आहे. राज्यातील तापमानात आणखी घसरण होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.


गेल्या आठवड्यात फेंगल चक्रीवादळामुळे थंडी गायब झाली होती. राज्यातील तापमानात वाढ झाली होती. मात्र आता हे वादळ गेल्याने थंडीचा जोर पुन्हा एकदा वाढू लागले. तसेच गार वारेही वाहत आहेत.


पुण्यामध्ये डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातील तापमान २० अंशापर्यंत गेले होते. त्यामुळे काही दिवस उकाडा जाणवत होता. मात्र आता पुन्हा तापमान घसरू लागल्याने थंडी परत आली आहे. रविवारपासून राज्यातील अनेक ठिकाणी नाशिक, पुणे, खांदेश, धुळे तापमान अचानक घसरले. हे घसरलेले तापमान १८ डिसेंबरपर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.


उंचीवरून वाहणाऱ्या उच्च वेगवान पश्चिम वाऱ्यांच्या झोतामुळे तापमानाचा पारा आणखी घसरेल. तसेच जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला परिसरासह अनेक ठिकाणी बर्फ पडत आहे.

Comments
Add Comment

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयात अधिकाऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या

Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान अपघातानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचे केंद्र सरकारला पत्र; हवाई वाहतूक मंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

कालबद्धरितीने चौकशी पूर्ण करणार मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर मुख्यमंत्री

एसटी चालकांच्या मद्यपानाविरुद्ध कडक पावले; मुख्यालयाकडून कठोर निर्देश

मुंबई :  २५ जानेवारी रोजी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी अचानकपणे परळ

वरळी कोस्टल रोडवर उभारणार मुंबईतील तिसरा हेलिपॅड; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : वरळीत मुंबईच्या कोस्टल रोडवर लवकरच हेलिपॅडची सुविधा उभारण्यात येणार आहे. हेलिकॉप्टर लँडिंगसाठी राजभवन,

Republic Day 2026 : प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ देशात सर्वोत्कृष्ट

नवी दिल्ली, २९ : देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर पार पडलेल्या दिमाखदार

Ajit Pawar : सोशल मिडियावरून पुन्हा व्हायरल होतोय अजितदादांचा मिश्किल, विनोदी अंदाज

महाराष्ट्राच्या राजकारणातील एका धडाडीच्या आणि शिस्तप्रिय पर्वाचा आज बारामतीच्या मातीत शेवट झाला. राज्याचे