मुंबई: गायब झालेली थंडी(Winter)राज्यात पुन्हा वाढू लागली आहे. राज्यातील अनेक भागांतील तापमान एका दिवसांत ४ अंशांनी घसरले आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी चांगलाच गारवा जाणवत आहे. राज्यातील तापमानात आणखी घसरण होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात फेंगल चक्रीवादळामुळे थंडी गायब झाली होती. राज्यातील तापमानात वाढ झाली होती. मात्र आता हे वादळ गेल्याने थंडीचा जोर पुन्हा एकदा वाढू लागले. तसेच गार वारेही वाहत आहेत.
पुण्यामध्ये डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातील तापमान २० अंशापर्यंत गेले होते. त्यामुळे काही दिवस उकाडा जाणवत होता. मात्र आता पुन्हा तापमान घसरू लागल्याने थंडी परत आली आहे. रविवारपासून राज्यातील अनेक ठिकाणी नाशिक, पुणे, खांदेश, धुळे तापमान अचानक घसरले. हे घसरलेले तापमान १८ डिसेंबरपर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
उंचीवरून वाहणाऱ्या उच्च वेगवान पश्चिम वाऱ्यांच्या झोतामुळे तापमानाचा पारा आणखी घसरेल. तसेच जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला परिसरासह अनेक ठिकाणी बर्फ पडत आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…