Cold weather : पुन्हा थंडी आली हो! राज्यातील तापमानाचा पारा घसरला

मुंबई: गायब झालेली थंडी(Winter)राज्यात पुन्हा वाढू लागली आहे. राज्यातील अनेक भागांतील तापमान एका दिवसांत ४ अंशांनी घसरले आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी चांगलाच गारवा जाणवत आहे. राज्यातील तापमानात आणखी घसरण होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.


गेल्या आठवड्यात फेंगल चक्रीवादळामुळे थंडी गायब झाली होती. राज्यातील तापमानात वाढ झाली होती. मात्र आता हे वादळ गेल्याने थंडीचा जोर पुन्हा एकदा वाढू लागले. तसेच गार वारेही वाहत आहेत.


पुण्यामध्ये डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातील तापमान २० अंशापर्यंत गेले होते. त्यामुळे काही दिवस उकाडा जाणवत होता. मात्र आता पुन्हा तापमान घसरू लागल्याने थंडी परत आली आहे. रविवारपासून राज्यातील अनेक ठिकाणी नाशिक, पुणे, खांदेश, धुळे तापमान अचानक घसरले. हे घसरलेले तापमान १८ डिसेंबरपर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.


उंचीवरून वाहणाऱ्या उच्च वेगवान पश्चिम वाऱ्यांच्या झोतामुळे तापमानाचा पारा आणखी घसरेल. तसेच जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला परिसरासह अनेक ठिकाणी बर्फ पडत आहे.

Comments
Add Comment

अनाथ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भातील अडचणी दूर करू

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्काचा भार हलका करणार, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

मुंबई : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जाची

नियम व अटींची पूर्तता केल्यासच गुंठेवारी प्रस्तावांना मंजुरी मिळणार; मंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई : राज्यातील गुंठेवारी नियमितीकरणाबाबत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गुंठेवारी विकास नियमित

राज्यातील चेक पोस्ट बंद करणार, मंत्री प्रताप सरनाईकांनी दिले आश्वासन

मुंबई : चेक पोस्ट संदर्भात लोकप्रतिनिधी तसेच विविध संस्थांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या विषयाची गंभीर दखल

महाराष्ट्रात गॅस, पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नाही 

 इराण-इस्राईल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विशेष समित्यांची स्थापना; रिफायनरींकडून उत्पादन वाढवले मुंबई : इराण

महाराष्ट्रात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांची काळजी घ्यावी; पाऊस आणि वाऱ्यापासून पिकांना सुरक्षित ठेवावे मुंबई :