इंम्पोर्टेड वाहनांचा वाढला ‘क्रेझ’

पिंपरी: मोठे उद्योग व्यवसाय, लाखो रुपयांचे नोकरीचे पॅकेज यामुळे शहरातील नागरिकांच्या जीवनमानात देखील कमालीचा बदल झाल्याची स्थिती आहे. बदलत्या जीवनशैलीबरोबरच इंम्पोर्टेड महागडी वाहने वापरण्याची ‘क्रेझ’ देखील शहरवासियांमध्ये दिसत आहे. गेल्या वर्षभरात पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाकडे तब्बल ३०३ इंम्पोर्टेड वाहनांची नोंद झाली आहे. त्यामध्ये दुचाकींपेक्षा चारचाकींचा अधिक समावेश आहे.



विदेशात तयार होणाऱ्या दुचाकी अथवा चारचाकी वाहनांना देशात आयात केले जाते, अशा वाहनांना इंम्पोर्टेड वाहने म्हणतात. दसरा, दिवाळीसारख्या शुभमुहूर्तावर घरोघरी नवनव्या वस्तुंची खरेदी करण्याची परंपरा आहे. त्यामुळे अनेकांच्या घरी नवीन वाहने दिसून येतात. दिवाळीच्या सुरूवातीपासून वसुबारस ते भाऊबीजेपर्यंत शहरात सात हजार ३४० वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. त्यामध्ये दुचाकी ते विविध अवजड प्रवासी व व्यावसायिक वाहनांची नोंद झाली आहे.


याद्वारे ४२ कोटींपेक्षा अधिक महसुल आरटीओ विभागाच्या खात्यात जमा झाला आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिक शहर असल्याने अनेकांचे मोठमोठे व्यवसाय, उद्योगधंदे, तसेच मोठमोठ्या पगारांच्या नोकऱ्यांचे पॅकेज असल्याने शहरात करोडपतींची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे, आवडीनुसार अनेकजण वेगवेगळ्या प्रकारच्या महागड्या वाहनांची खरेदी करून आपली हौस पूर्ण करतात.

Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,