इंम्पोर्टेड वाहनांचा वाढला ‘क्रेझ’

  53

पिंपरी: मोठे उद्योग व्यवसाय, लाखो रुपयांचे नोकरीचे पॅकेज यामुळे शहरातील नागरिकांच्या जीवनमानात देखील कमालीचा बदल झाल्याची स्थिती आहे. बदलत्या जीवनशैलीबरोबरच इंम्पोर्टेड महागडी वाहने वापरण्याची ‘क्रेझ’ देखील शहरवासियांमध्ये दिसत आहे. गेल्या वर्षभरात पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाकडे तब्बल ३०३ इंम्पोर्टेड वाहनांची नोंद झाली आहे. त्यामध्ये दुचाकींपेक्षा चारचाकींचा अधिक समावेश आहे.



विदेशात तयार होणाऱ्या दुचाकी अथवा चारचाकी वाहनांना देशात आयात केले जाते, अशा वाहनांना इंम्पोर्टेड वाहने म्हणतात. दसरा, दिवाळीसारख्या शुभमुहूर्तावर घरोघरी नवनव्या वस्तुंची खरेदी करण्याची परंपरा आहे. त्यामुळे अनेकांच्या घरी नवीन वाहने दिसून येतात. दिवाळीच्या सुरूवातीपासून वसुबारस ते भाऊबीजेपर्यंत शहरात सात हजार ३४० वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. त्यामध्ये दुचाकी ते विविध अवजड प्रवासी व व्यावसायिक वाहनांची नोंद झाली आहे.


याद्वारे ४२ कोटींपेक्षा अधिक महसुल आरटीओ विभागाच्या खात्यात जमा झाला आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिक शहर असल्याने अनेकांचे मोठमोठे व्यवसाय, उद्योगधंदे, तसेच मोठमोठ्या पगारांच्या नोकऱ्यांचे पॅकेज असल्याने शहरात करोडपतींची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे, आवडीनुसार अनेकजण वेगवेगळ्या प्रकारच्या महागड्या वाहनांची खरेदी करून आपली हौस पूर्ण करतात.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या