सोलापूर : राज्य सरकारला सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवणार्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा(Ladki Bahin Yojana) अर्ज भरण्याची शेवटची तारीख उलटून गेली आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर होती. आता ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करता येत नाही. या योजनेपासून अनेक महिला वंचित असून त्यांना अर्ज करण्यासाठी आणखी मुदत वाढवून देण्याची मागणी महिलावर्गातून होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर ‘लाडकी बहीण’ योजना सुरू ठेवणार असल्याचे सांगितले आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेत आतापर्यंत ज्या महिलांनी अर्ज भरले नाहीत त्यांना आता अर्ज भरता येणार का याबाबत अनिश्चितता आहे. यामुळे अनेक महिलांनी ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी पुन्हा अर्ज करण्यास सवलत देण्याची मागणी करण्यात येते आहे.
राज्यात साधारण सव्वादोन कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. सोलापूर जिल्ह्यात या योजनेंतर्गत १० लाख ५२ हजार ३९२ महिला आहेत. जिल्ह्यासाठी पुढील वाढीव हप्ता २१५ कोटी ३३ लाख २५ हजारांचा आहे. योजनेंतर्गत आता काही निकष असणार आहेत