Pune School Bus Fire : पुण्यात स्कूल बस जळून खाक; विद्यार्थी थोडक्यात बचावले

पुणे : खराडी परिसरातील तुळजा भवानी नगर परिसरात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास स्कूल बसला आग लागली. यावेळी बस मध्ये १५ ते २० विद्यार्थी होते.त्यांना सुरक्षितपणे खाली उतरविण्यात आले. यानंतर बस ने पूर्ण पेट घेतला.महापालिका अग्निशमन दलाच्या दोन वाहनांनी ही आग आटोक्यात आणली. मात्र बस पूर्णपणे जळून खाक झाली. फोनिक्स वर्ल्ड स्कूलची ही बस होती. शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.



खराडी येथील फिनिक्स वर्ल्ड शाळेची बस दुपारी महावितरण कार्यालयाच्या परिसरातून निघाली होती. या बसमधून १५ विद्यार्थी प्रवास करीत होते. रस्त्यात बसमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. ही बाब लक्षात येताच चालकाने बसमधील विद्यार्थ्यांना तातडीने खाली उतरवले. त्यानंतर काही क्षणातच बसने पेट घेतला. माधव राठोड असे या बसचालकाचे नाव आहे. त्यांनी प्रसंगावधान राखले नसते, तर मोठा अनर्थ घडला असता. चालक राठोड यांनी बसवर वेळीच ताबा मिळविल्याने सर्व विद्यार्थी सुखरूप बचावल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिली.

 

 

 
Comments
Add Comment

आई म्हणाली अभ्यास कर, मुलीने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अगदी लहान कारणामुळे एका १८ वर्षीय

Beed Crime Govind Barge Death : प्रेम, पैसा आणि लॉज कनेक्शन…गोविंद बर्गेप्रकरणात नर्तकी पूजाचा नवा ट्विस्ट समोर

बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या मृत्यू

विदर्भातील स्पेशल ‘कच्चा चिवड्या’चा विश्वविक्रम

नागपूर : कच्चा चिवडा हा शब्द कानावर पडला तरी तोंडाला पाणी सुटते. कच्चा चिवडा ही विदर्भामधील एक झटपट बनणारी

मुसळधार पावसाचा धुमाकूळ, मराठवाड्यात हजारो हेक्टर शेती गेली वाहून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सह संपूर्ण मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले. मराठवाड्यातील

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता कर्करोग उपचार केंद्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे दरवर्षी अनेक लोकं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वाढत

साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत

धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांनी साधारण २० ते २५ क्विंटल कांदा हा उकिरड्यावर फेकला