Pune School Bus Fire : पुण्यात स्कूल बस जळून खाक; विद्यार्थी थोडक्यात बचावले

  140

पुणे : खराडी परिसरातील तुळजा भवानी नगर परिसरात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास स्कूल बसला आग लागली. यावेळी बस मध्ये १५ ते २० विद्यार्थी होते.त्यांना सुरक्षितपणे खाली उतरविण्यात आले. यानंतर बस ने पूर्ण पेट घेतला.महापालिका अग्निशमन दलाच्या दोन वाहनांनी ही आग आटोक्यात आणली. मात्र बस पूर्णपणे जळून खाक झाली. फोनिक्स वर्ल्ड स्कूलची ही बस होती. शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.



खराडी येथील फिनिक्स वर्ल्ड शाळेची बस दुपारी महावितरण कार्यालयाच्या परिसरातून निघाली होती. या बसमधून १५ विद्यार्थी प्रवास करीत होते. रस्त्यात बसमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. ही बाब लक्षात येताच चालकाने बसमधील विद्यार्थ्यांना तातडीने खाली उतरवले. त्यानंतर काही क्षणातच बसने पेट घेतला. माधव राठोड असे या बसचालकाचे नाव आहे. त्यांनी प्रसंगावधान राखले नसते, तर मोठा अनर्थ घडला असता. चालक राठोड यांनी बसवर वेळीच ताबा मिळविल्याने सर्व विद्यार्थी सुखरूप बचावल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिली.

 

 

 
Comments
Add Comment

Devendra Fadanvis : कोंचिग क्लासमधील लैंगिक छळाप्रकरणी SIT स्थापन करणार; नराधमांना कठोर शिक्षा देणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक

Pratap Sarnaik: आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था

एसटी कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था स्वखर्चाने करणार - प्रताप सरनाईक  मुंबई: आषाढी एकादशी निमित्त श्री.

Monsoon Update : विदर्भात मान्सून निराशाजनक; नागपूरसह पाच जिल्हे रेड झोनमध्ये? शेतकरी चिंताग्रस्त!

नागपूर : विदर्भात यंदा मान्सूनचे अपेक्षेपेक्षा पंधरा दिवस लवकर आगमन झाल्यानंतर शेतकरी व सामान्य जनतेला

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या

नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश नांदगाव : नांदगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी

वारीतलं रिंगण : चैतन्य फुलवणारा सोहळा!

इंदापूर : आषाढी वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नाही, ती आहे विश्वासाची, भक्तीची आणि नित्य उत्साहाची