मी ‘काडतूस’आहे …झुकेगा नही!

चित्रा किशोर वाघ (आमदार, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य)


‘मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे घर मत बसा लेना, मै समंदर हूं, वापस आऊंगा’, असं तो म्हणाला, तेव्हा त्याची खिल्ली उडवली गेली...पण आज हा समुद्रासारख्या विशाल अंतःकरणाचा, समुद्राएवढ्या कर्तृत्वाचा, समुद्राइतकी वैचारिक खोली असणारा देवाभाऊ परत आलाय. ‘आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत, आम्ही चक्रव्यूह भेदणं जाणतो’, असं हा आधुनिक अभिमन्यू म्हणाला, तेव्हा त्याची चेष्टा झाली, पण त्यानं कावेबाजांचा, कुटिल कारस्थानांचा चक्रव्यूह भेदला. असा काही भेदला की, त्यातून उडालेल्या तेजाच्या किरणांनी भल्याभल्यांचे डोळे दीपून गेले.


कुरुक्षेत्रावरचं युद्ध खूप जटिल, अवघड असणार आहे, हे या अभिमन्यूला माहीत आहे... पण त्याला कर्तृत्वाची कवचकुंडलं मिळाली आहेत. ती घेऊन सर्वशक्तिनिशी तो परत आलाय. ‘मी पुन्हा येईन’ असं देवाभाऊ म्हणाला, तेव्हा त्याच्याविरुद्ध पाच वर्षं सातत्यानं कटकारस्थानांचे डोंगर रचले गेले; पण तो परत आलाय!!! परत आलाय गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. ‘देवाभाऊ जो बोलता है, वो करता है, और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है’ असं म्हणणारा देवाभाऊ पाच वर्षांआधी जे बोलला, ते त्यानं करून दाखवलंय दोस्तों... आणि जे नाही बोलला, ते ‘डेफिनेटली’ करण्यासाठी आता परत आलाय. ‘फडतूस नाही, काडतूस आहे. झुकेगा नही घुसेगा साला’ असं तो म्हणाला होता. येस्स. या देवाभाऊनं ‘फडतूस’ लोकांना ‘काडतूस’ बनून पाताळात गाडलं... आता ‘झुकण्या’साठी नाही, तर ‘घुसण्या’साठी तो परत आलाय.


देवाभाऊचा पाच वर्षांचा मुख्यमंत्रीपदाचा काळ हा महाराष्ट्राच्या विकासाच्या इतिहासातला सगळ्यात सोनेरी कालखंड होता. त्यानंतर अडीच वर्षं तो विरोधी पक्षनेता बनून कुटिल लोकांवर तुटून पडला. पुढची अडीच वर्षं धोरणीपणानं डावपेच आखत राहिला. आता तो परत आलाय. त्याचा पिक्चर संपलेला नाही. उलट त्याचा पिक्चर आता ॲक्शननं भरपूर असणार आहे. त्याच्या पिक्चरचं नाव कुणी तरी ‘अकेला फडणवीस’ असं ठेवलं होतं... पण त्याला चौदा कोटी जनतेनं पुन्हा एकदा ‘हिरो’ बनवलं. येस्स. तमाम महाराष्ट्राचा लाडका, जिगरबाज, चाणक्यनीतीत तरबेज, बहिणांचा पाठिराखा, शेतकऱ्यांचा सच्चा साथी, वंचितांचा खंदा आधार असलेला देवाभाऊ पाच वर्षांसाठी अवतरला आहे. आता तो काय करतो ते बघाच....देवाभाऊका असली पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...!

Comments
Add Comment

गाव-खेड्यात बिबट्याची दाहकता; समस्या व उपाय

गेल्या काही आठवड्यांपासून बिबट्या आणि मानवी संघर्षाच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे हा प्रश्न सध्या

पाकिस्तान हुकूमशाहीच्या दिशेने...

पाकिस्तानने संरक्षण दल प्रमुख असे पद निर्माण करत त्याची जबाबदारी लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याकडे सोपवली.

गुन्हेगार वापरत असलेल्या कायद्याच्या पळवाटा आणि त्यामागील मानसिकता

'गुन्हा आणि शिक्षा' हे मानवी समाजाचे एक अविभाज्य चक्र आहे. जिथे गुन्हा घडतो, तिथे त्या गुन्ह्याला आळा घालणारी

अभिमान संविधानाचा: समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्वाचा!

जगातील कोणत्याही देशापेक्षा सर्वात मोठे लिखित असे संविधान तयार करून, केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जगाला

तगडा नायक , उमदा माणूस

पंजाबच्या मातीतून आकाराला आलेलं शिल्प म्हणजे धर्मेंद्र. बलदंड शरीर, तितकाच सोज्वळ चेहरा आणि दमदार अभिनय.

सारे काही बेस्टसाठी...

मागील आठवड्यात आपण पाहिलेच की, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या भल्याची जणू सर्वांनाच अचानक काळजी वाटू लागली आहे. आजवर